डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली? पुस्तक प्रकाशन तृतीय स्मृतिदिनानिमित्त प्रा. हरी नरके स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन

0

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि पुरोगामी चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व स्मृतिशेष प्रा. हरी नरके यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ‘प्रा. हरी नरके स्मृती प्रतिष्ठान’ द्वारे विशेष व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक व्याख्यानाचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतर्गत प्रा. हरी नरके यांच्या प्रथम स्मृतिदिनी मा. कुमार केतकर, तर द्वितीय स्मृतिदिनी मा. राजू परुळेकर या ज्येष्ठ पत्रकारांची व्याख्याने श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.

या वर्षीच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कारविजेते, ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक, समीक्षक, विचारवंत तसेच ‘मराठी भाषा अभिजात दर्जा समिती’चे अध्यक्ष मा. रंगनाथ पठारे सर यांचे मुख्य व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा  सरकारविरोधी वातावरणाची संधी साधण्यास काँग्रेसची ‘छात्रों की गुंज’ पुण्यातून का ? यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचा पुण्यात तळ

तसेच या प्रसंगी नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या स्मृतिशेष प्रा. हरी नरके लिखित ‘पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ या पुस्तिकेच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मा. रंगनाथ पठारे सर यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य, विचार आणि विवेकाचा हाच वारसा प्रवाही ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या वैचारिक सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन प्रा. हरी नरके स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कार्यक्रम तपशील :

• दिनांक : रविवार, ९ ऑगस्ट २०२६

• वेळ : सायंकाळी ५:०० ते ८:००

• स्थळ : एच. व्ही. देसाई महाविद्यालय सभागृह, भाऊ रंगारी रोड, शनिवार वाड्यामागे, पुणे.

अधिक वाचा  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरची टीका जिव्हारी स यादी निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बिडकर यांचेही खुले पत्र

Google Location : 

https://share.google/4YENt97NoifQso2oC