देशातील १६ हवामानशास्त्रीय उपविभाग आणि महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसह एकूण ४० टक्के क्षेत्रावर एक जून ते पाच ऑगस्ट या कालावधीत अपुरा पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात या कालावधीत पावसाची सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त; तर देशात सरासरीपेक्षा ११.५ टक्के कमी नोंद झाली आहे.जुलै महिन्यात देशात सरासरीच्या तुलनेत एक टक्का जास्त, तर राज्यात ४० टक्के जास्त पाऊस नोंदला गेला. जुलैच्या पावसामुळे राज्यावर आतापर्यंत ‘एल निनो’चा प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे चित्र आहे.







मॉन्सूनच्या संथ वाटचालीसह जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये बंगालच्या उपसागरात चार कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्यांपैकी तीन क्षेत्रांची तीव्रता वाढून ती महाराष्ट्रासाठी अनुकूल स्थितीत आल्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस झाला. कोकणात पाच ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा दोन टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ३६ टक्के जास्त, मराठवाड्यात १० टक्के कमी, तर विदर्भात ११ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग सर्वसाधारण पावसाच्या श्रेणीमध्ये (सरासरीच्या १९ टक्के कमी- अधिक) असून, मध्य महाराष्ट्रात अतिरिक्त (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त) पाऊस नोंदला गेला आहे.
देशात राज्य निहाय पाऊस
अतिवृष्टी – लडाख
अतिरिक्त पाऊस – ओडिशा
सर्वसाधारण पाऊस – जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू, अंदमान-निकोबार बेटे
अपुरा पाऊस – पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, पुदुच्चेरी, लक्षद्वीप बेटे.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पावसाचे चित्र
अतिवृष्टी (सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून जास्त पाऊस) – नाशिक, पुणे
अतिरिक्त पाऊस (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त) – पालघर, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगरसर्वसाधारण पाऊस (सरासरीपेक्षा १९ टक्के कमी- अधिक) – ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
अपुरा पाऊस (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी) – सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, जालना, बीड, हिंगोली













