माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणी मोठी कारवाई

0

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणात अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ जारी करत काही व्यक्तींची नावं घेतली होती. वेगवेगळ्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा दावा होता. त्यातला एक व्यवहार पुण्यातल्या रविवार पेठेतल्या वक्फ बोर्डाच्या जागेचा होता.

नेमकं प्रकरण काय?

अधिक वाचा  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरची टीका जिव्हारी स यादी निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बिडकर यांचेही खुले पत्र

पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेवर उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीकडून इमारत बांधण्यात येत होती. यामध्ये खलील शेख यांच्यासोबत प्रतिभा धंगेकर, वर्षा शेडगे यांच्यासह पाच भागीदार होते. मात्र हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता, या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी याप्रकरणी तेव्हा भाजपर आरोप केले होते.या प्रकल्पातील पाचही भागीदार कर्ज भरु न शकल्याने शेख खलील यांनी आत्महत्या केल्याचा दावा, रवींद्र धंगेकर यांनी केला होता. मात्र खलील शेख यांनी व्हिडीओत दावा केला होता की, बाळा शेडगे आणि रवींद्र धंगेकर यांनी ५० लाख दिले नाहीत, त्यामुळे आत्महत्या करीत आहे.. यासह इतरांनीही फसवलं असल्याचं शेख व्हिडीओत म्हणाले होते.

अधिक वाचा  पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा! पुणे रिंगरोड पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर काय म्हणाले?

”आम्ही कुठल्याही व्यवहारात नव्हतो. या व्यवहारातून आम्ही २०२५ लाच बाहेर पडलो होतो. हा प्रोजेक्ट हा राजकारणाचा बळी ठरलेला प्रोजेक्ट आहे. मी आमदार झालो म्हणून प्रोजेक्टचं नुकसान झालेलं आहे. आम्ही सगळे भागीदार या प्रोजेक्टमुळे देशोधडीला लागलेलो आहोत.” अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.

साड्यांसाठी केली होती 100 कोटींची तरतूद

राज्यात 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही साडी दिवाळीत वितरीत करण्यात येत होती. या योजनेसाठी जवळपास वार्षिक 100 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून 2023, 2024, 2025 अशी सलग तीन वर्षे साड्यांचे वितरण करण्यात आले होते. यंदा ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी साडीचे वितरण केले जाणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. योजनेचा आर्थिक भार लक्षात घेऊन योजना बंद करण्यात आल्याचेही सांगण्यात आलं आहे. आता यावर अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागंल आहे.

अधिक वाचा  पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद; मंत्री जयकुमार गोरे यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार