सुनेत्रावहिनींकडून चाणाक्ष्य ‘अजितनिती’चा वापर; यांची 2029ची ‘उमेदवारी’ फिक्स? जबाबदारीची अशी वाटणी

0

बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता.२४) मतदान पार पडलं. बारामतीच्या जबाबदारीतून मुक्त होताच  सुनेत्रावहिनी पवार यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी पूर्ण वेळ मिळावा या हेतूने चाणाक्ष्य ‘अजितनीती’चा वापर करून बारामती विधानसभा मतदारसंघाची 2029 ची तयारी सुरू केली आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षासाठी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी जबाबदाऱ्यांचे ३ टप्प्या वाटप केल्याचं सांगितलं जात आहे. 

आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार राज्यभरात फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. तर राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर अनेक घडामोडी सुरू असल्याचं दिसत आहे.

अधिक वाचा  तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण…, प्राजक्त तनपुरेंच्या या वक्तव्याने नवी चर्चा, शरद पवार गटाचीही पहिली प्रतिक्रिया

बारामती पोटनिवडणुक मतदानादरम्यान जय पवार यांनी २०२९ मध्ये बारामती विधानसभेसाठी मी उमेदवार व्हावे, अशी कार्यकर्त्यांची आणि लोकांची मागणी असल्याचं वक्तव्य केलं. जय यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी देखील २०२९ च्या बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर दुसरीकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असं वक्तव्य केलं. या दोघांच्या वक्तव्यामुळे एकीकडे पवार कुटुंबियांमध्ये २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून फूट पडणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवारांना बाजुला सारून काही नेत्यांना पक्षाची सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायचे असल्याचे आरोप केले जात आहेत. अशातच आता पक्षावर आपली पकड मजबूत रहावी यासाठी राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्यासाठी सुनेत्रावहिनींकडून हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  अविनाश भोसले यांना मोठा दिलासा! ईडी कारवाईस न्यायाधिकरणाची लगाम, मालमत्तेवरील जप्ती रद्द, तपासाचे निष्कर्षही विसंगतच 

शिवाय अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पार्थ आणि जय हे दोघेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर गेलेत तर इकडे जय पवारांनी कालच २०२९ ला बारामती विधानसभेसाठी मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी राजकारण सोपं व्हावं यासाठी दोन्ही मुलांना आपापल्या कार्यक्षेत्रात लक्ष देण्यासाठी या जबाबदाऱ्यांचं वाटप केल्याचंही पक्ष संघटनेत बोललं जात आहे.