कोथरूड सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अवमान विरोधात निषेध आंदोलन

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान यांचे कार्य असल्याचा उल्लेख करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोथरूड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. कोथरूड परिसरातील सर्व नगरसेवकांसह असंख्य शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत धर्मविरोधी हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन करून उद्रेक जाहीर केला. यावेळी पोलीस उपायुक्तांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात एल्गार पुकारून हिंदूंचे स्वराज्य उभे केले, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले आणि प्रशासनात कधीही धर्म, जात किंवा पंथाच्या आधारे दुजाभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, ते महाराष्ट्राच्या व संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रतीक आहेत. अशा महान राष्ट्रपुरुषांची तुलना काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी व कप्लेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्याशी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  कर्वेनगरमध्ये मुठा नदी जलपर्णी काढण्यास सुरुवात; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांच्या प्रयत्नाला यश

टिपू सुलतान याने स्वतःचे इस्लामी साम्राज्य वाढवण्यासाठी असंख्य हिंदूंची कत्तल केली व देशात मुसलमानी दहशत निर्माण केली, अशी ऐतिहासिक नोंद असतानाही हेतू परस्पर अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे हे इतिहासाचे विकृतीकरण असून, भारतीय समाजाच्या सांस्कृतिक भावनांवर थेट आघात करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी प्रशासनाचे आदर्श आणि भारतीय संस्कृतीतील न्याय, शीर्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व अत्याचारी राज्यकर्त्याचे उदात्तीकरण करणे हे केवळ वैचारिक चूक नाही, तर भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा आणि समाजमानसाचा अपमान आहे. अशा तुलनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे अवमूल्यन होते आणि खोटा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न होतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करून मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हिंदवी स्वराज्य नको आहे का? त्यांना देशामध्ये टिपू सुलतान म्हणजे इस्लामी राज्य प्रस्थापित करण्याची संविधान विरोधी भूमिका हवी असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.

अधिक वाचा  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच तापवणार!अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्…; ‘हे’ मुद्दे केंद्रस्थानी