राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम, सोहळे आणि सार्वजनिक आयोजन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.






“मी माझा मित्र गमावला आहे” : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया व प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. “अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान नेता गमावला आहे. ही हानी कधीही भरून निघू शकत नाही. मी माझा एक जिवलग सहकारी आणि मित्र गमावला आहे. अशा वेळी कोणताही आनंदोत्सव साजरा करणे मला योग्य वाटत नाही,” असे शिंदे म्हणाले. तसेच, पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना
वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी व उत्साह टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणीही पुष्पगुच्छ, महागड्या भेटवस्तू आणू नयेत, होर्डिंग्ज, बॅनर किंवा जाहिराती लावू नयेत, केक कापणे, मिरवणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, वाढदिवसासाठी होणारा खर्च सामाजिक कार्य किंवा गरजूंना मदतीसाठी वापरावा.
राजकीय वर्तुळातून कौतुक
एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि संयमाचे कौतुक केले जात आहे. ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.











