पुणे महापालिकेत वारजे माळवाडी भागाचा समावेश झाल्यापासून केवळ आणि केवळ राजकीय गणिते जुळवण्यासाठी आणि आपल्या बगल बच्चनच्या फायद्यासाठी ध्येय व धोरणे आखण्यात आल्याने वारजे माळवाडी हे समस्यांचे आगर बनले! जनहित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्य सुखकर करणे हा साधा विषयही ज्यांच्या मनात येत नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज साहेबांची वाघीण भाग्यश्री कैलास दांगट निवडणुकीच्या रणांगणात उभी आहे. वारजे माळवाडी मध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळीशी गेला पोचली असली तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे गंभीर समस्या असलेल्या वाहतूक कोंडी, पाणी टंचाई अन् बरेच काही… विषयावर चकार शब्द न काढता वीस वर्ष सत्तेत राहणाऱ्या लोकांकडून फक्त मतांचा जोगवा मागवण्याचं काम केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर ज्या मार्गाचा वापर सिंहगडाकडे जाण्यासाठी केला आजही फक्त तेवढ्याच रस्त्यावरून वारजे माळवाडीची वाहतूक सुरू असणे किती खेददायक आहे याची जाणीव या राज्य साहेबांच्या वाघिणीला झाली आहे. राज्यकारण सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी! नगरसेवक नव्हे जनसेवक! या उदात्त हेतूने भाग्यश्री कैलास दांगट जीवाभावांच्या भिडूसहित मतांचा कौल घेण्यासाठी घराघरात पोहोचत आहेत.






वारजे माळवाडी भागामध्ये नुसत्या मुख्य हायवे रस्त्यालगत हिरवळीच्या लॉन्स टाकून ‘वारजे बदलतेय अन् काम म्हणजे…..’ अशा वल्गना करणाऱ्या आणि मुख्य सेवा रस्त्यांच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेली जागा अडवून ठेवणारे वाड्यावरचे आपली राज्यगादी टिकवण्यासाठी वेगळ्या पक्षात डेरे दाखल झाले. जनहिताची काळजी आहे अशी गरळ एकच कधी विकास कृती समितीचा गाजावाजा करण्यात आला तर कधी राज्यातील मोठ्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांच्या आयोजन केले परंतु वारजेकर नागरिकांच्या नशिबी मात्र निराशाच आली. पुणे महापालिकेच्या वतीने या भागातील नेतृत्वाला उपमहापौर व माजी विरोधी पक्षनेतेपद अशी मानाची पदे दिली तरीसुद्धा या भागातील समस्या न सुटणे ही निष्क्रियता मतदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार घरोघरी दारोदारी पोहोचत आहेत. वाहतूक कोंडी, पाणी टंचाई अन् बरेच काही… प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव ‘रामबाण’ उपाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिनच असून मतदारांनी पुणे महापालिकेत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी करत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रचार करत आहेत.
वारजे माळवाडी भागाचा पुणे महापालिकेने विकास आराखडा 20 वर्षांपूर्वी मंजूर केला तरी सुद्धा आजही ‘सेवा’ रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. लोकसंख्येला आवश्यक पाण्याची क्षमता नाही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 24×7 पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी बनवूनही पाणीटंचाई सुटलेली नाही. पूर्वी वस्ती विभागामध्ये पाणीटंचाई जाणवत होती आज ती सोसायटी भागातही जाणवत आहे ही या सक्रिय नेतृत्वाची देण आहे. वारजे माळवाडीतील नागरिकांनी अगोदरच या नेतृत्वाच्या कक्षा आणि मर्यादा यांचा अनुभव घेतला असून आत्ता ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराकडून केले जात आहे. वारजे माळवाडी, न्यू अहिरेगाव, शिवणे, नांदेड रस्त्यापर्यंत रोज होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय शोधण्यासाठी रेल्वे इंजिन हा पर्याय असल्याचे नागरिकांना पटवून देण्याची वारजे माळवाडी प्रचाराची दिशा ठरवली आहे.
वारजे माळवाडी परिसरातील अखेर आकाश नगर ते हायवे व सेवा रस्ता, वारजे नदीवरील मुख्य रस्त्यालगत सेवा रस्त्यासाठी उड्डाणपूल, सेवा रस्त्यात बाधित होणारी स्मशानभूमी, वारजे संजीवन खिंड( डुक्करखिंड)- ते नदीपर्यंत सेवा रस्ता अपूर्ण, बीडीपी रस्त्यासाठी 0.4 टीडीआरऐवजी 1 एफएसआय, सेवा रस्त्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला (5 गुंठे पेक्षा जास्त जमीनधारकांना रोख), पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात नियोजित करण्यात आलेला अहिरेगाव – जांभुळवाडी रिंगरोड पूर्ण करणे, शिवणे-नांदेड पूल आणि नव्या पूलांचा पर्याय (धरणालगतचा पूल जुना झाल्याने धोकादायक) अशा मूलभूत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मनसैनिकांकडून दिले जात असल्याने प्रचारामध्ये उत्साह आणि आश्वासक वातावरण तयार झाले आहे.











