पुणे जागावाटपावर फडणवीस-शिंदे चर्चा आज! युती झाल्यास अनेकांना घ्यावी लागेल माघार

0

पुणे शहरातील भाजपच्या काही हट्टवादी नेत्यांसोबत ‘मुरली’स्वर जुळल्यामुळे अडचणीत आलेल्या भारतीय जनता पक्षाला वाचवण्यासाठी ‘देवाभाऊ’ हा एकमेव पर्याय राहिला असल्याने भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यात आज, गुरूवारी बैठक होणार आहे. एकीकडे नाराज नगरसेवक महायुतीतून बाहेर पडले आणि दुसरीकडे शिवसेना मनसे लढती लक्षणीय झाल्यामुळे युती, जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल. युती झाली तर अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. एबी फाॅर्म मिळूनही हाती निराशा येणाऱ्या शिवसैनिकांसह भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधुक वाढली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ताकद असलेल्या प्रभागात एबी फाॅर्म दिले. त्यामध्ये जवळपास ११० जणांना एबी फाॅर्म दिल्याचे शिवसेनेने सांगितले. त्यातील छाननीनंतर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, उमेदवारी वैद्य झालेल्या उमेदवारांनी आता मतदारांच्या गाठी-भेटी आणि बैठकांना सुरवात केली आहे. दुसरीकडे माघारीच्या दिवशी अर्ज मागे घेण्याची वेळ येणार तर नाही ना? याची धाकधुकही शिवसैनिकांसह भाजपच्या काही उमेदवारांमध्ये आहे. पक्षाकडून एबी फाॅर्म दिले असले तरी युतीतील जागावाटपाचा निर्णय झाल्यावर ज्या ठिकाणी शिवसेनेला जागा सोडल्या जातील त्याठिकाणचे एबी फाॅर्म कायम राहतील. मात्र, ज्या ठिकाणी भाजपच्या जागा आहेत, त्याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल, अशा सूचना देऊनच एबी फाॅर्म दिल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  नवनिर्वाचितांचं नवं आव्हान! वरिष्ठ सल्ले मार्गदर्शन पूर्ण; शहरात प्रचंड विजय पण अत्यंत महत्त्वाचे हे भाग ठरेनात

पुढील २४ तासात शिवसेना-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, त्यामध्ये युतीचा आणि जागावाटपाचा निर्णय होणार आहे. त्यानंतर पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये युती झाल्यावर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा किती आणि किती उमेदवारांना अर्ज मागे घ्यावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अर्ज मागे घेण्यास सांगताना दोन्ही पक्षाची चांगलीच कसरत होणार आहे.

नेत्यांची कसरत

शिवसेनेने ११० जणांना एबी फाॅर्म दिले आहेत. यातील ७० जणांचे एबी फाॅर्म कायम राहिले असून, सहकारनगर परिसरात तर एबी फाॅर्म गिळल्याच्या घटना समोर आल्या. आता भाजप-शिवसेना युती झाली आणि शिवसेनेला १५ एवजी २० जागा मिळाल्या तर ७० पैकी २० जागांवरील उमेदवारी कायम राहील. मात्र, ५० जणांना उमेदवारी मागे घ्यावी लागेल.

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण

यावेळी शिवसेना नेत्यांची कसरत होऊ शकते. त्यातही शिवसैनिकाने माघार घेण्यास नकार दिला, दुरध्वनी बंद ठेवला किंवा माघारीच्या दिवशी आलाच नाही तर अर्ज कायम राहून बंडखोरी वाढणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नाही.