“सतीश वाघांच्या हत्येपूर्वी पत्नीकडून जादूटोण्याचा प्रयोग करून…”; १५ मिनिटांत ७२ वार निर्घृण हत्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

0

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या निर्घृण हत्येचे गूढ आता उलगडू लागले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून, त्याला कटात सामील करणारी मोहिनी वाघच असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून झाला आहे. विशेष म्हणजे, सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आल्याचे या चौकशीत समोर आले आहे.

१,००० पानी आरोपपत्र दाखल; सहा आरोपींवर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पुण्यातील लष्कर न्यायालयात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १,००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रमुख आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यासह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त संविधान प्रबोधनचे आयोजन!

१५ मिनिटांत ७२ वार करून निर्घृण हत्या

९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. केवळ १५ मिनिटांतच आरोपींनी त्यांच्यावर तब्बल ७२ वार करून क्रूर हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो शिंदवणे घाटात टाकण्यात आला.

हत्येचा तपास कसा उलगडला?

या घटनेनंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून हडपसर पोलिसांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. चौकशी दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्यांच्या कटकारस्थानांची सखोल माहिती समोर आली.

अधिक वाचा  ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ ३३ % महिला आरक्षण आज संसदेचे 2 दिवस विशेष अधिवेशन सुरु; अशी आहे संरचना

जादूटोण्याच्या प्रयोगामुळे हत्या?

आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे की, मोहिनी वाघने सतीश वाघ यांना संपवण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केला होता. या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली आहे.

अतिरिक्त तपास सुरूच

आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयात कार्यवाही सुरू असून, पोलिस अधिक तपशीलवार तपास करत आहेत. या हत्याकांडाने पुण्यात खळबळ उडवली असून, पुढील काही दिवसांत न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.