पाकिस्तानात तब्बल २९ वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन ज्याची भीती होती तेच… चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं संकट

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले आहे. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानात कुठल्याही आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. पाकिस्तानात स्पर्धेचे आयोजन न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दहशतवादी हल्ल्याची भीती. त्यामुळेच भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. तर उर्वरीत सर्व संघांचे सामने पाकिस्तानात आयोजित केले जात आहेत. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहूण्यांचे अपहरण करण्याचा प्लान केला जात आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा  सुनेत्रावहिनी पवारांची साहेबांच्या ६दशकांच्या प्रवासासाठी खास पोस्ट!; साहेबांचे मार्गदर्शन प्रेरणा आगामी काळातही…

इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) अरब आणि चिनी नागरिकांचे खंडणीसाठी योजना आखत आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळ, बंदरे आणि निवासी क्षेत्रांवर ते नजर ठेवून आहेत.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतचे कार्यकर्ते घर भाड्याने घेण्याची योजना आखत आहेत. शहरांच्या बाहेरील भागात जिथे सीसीटीव्ही नाहीत किवा फक्त मोटरसायकल आणि रिक्षाने पोहोचता येईल अशीच ठिकाणं निवडली असती. हे अपहरणकर्ते, रात्रीच्या वेळी अपहरण करुन त्या व्यक्तींना या घरांमध्ये ठेवण्याचा प्लान करत आहेत.

आता अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने अधिकाऱ्यांना महत्वाच्या ठिकाणांवर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतच्या संभाव हल्ल्याबद्दल सतर्क केलं आहे. याबाबत माहिती मिळताच, संबधितांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरु केले आहेत.

अधिक वाचा  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच तापवणार!अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्…; ‘हे’ मुद्दे केंद्रस्थानी