संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय? वाचा सविस्तर

0
1

राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाची प्रशंसा केली. विधानसभेतील पराभवाचे मंथन करताना या दोन्ही पक्षांनी संघाचे कोडकौतुक केले. पण काँग्रेसने पराभवाचे मंथन करताना संघाची आरती ओवाळली नाही. उलट सरसंघचालक मोहन भागवत आणि निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणूक आयोगावर प्रहार

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागीतली ती त्यांनी दिली नाही, असा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सरसंघचालकांवर साधला निशाणा

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. इतर एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती, असे गांधी म्हणाले. राम मंदिर तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर गांधी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

मोहन भागवतांचं वक्तव्य तरी काय?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी सोमवारी एक वक्तव्य केले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी व्हावी असे म्हणणे त्यांनी मांडले. कित्येक शतकांपासून आक्रमण सहन करणाऱ्या देशासाठी हेच खरं स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले होते.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

त्यावरून राहुल गांधी यांनी हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारांमधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले.