महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतरच्या आरोपांवर EC कमिशनने दिलं उत्तर ….. ईव्हीएम फूलप्रूफ डिवाईस

0

वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत पहिली विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेच्या आरंभी देशातील नागरिक आणि मतदारांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राजीव कुमार यांची ही तशी शेवटची पत्रकार परिषदत आहे. कारण 18 फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त होत आहेत. 2024 हे जगात निवडणूक वर्ष ठरलं. दोन-तृतीयांश लोकसंख्येने मतदान केलं. 2024 साली भारतात आठ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. चांगलं वातावरण होतं. अनेक नवीन किर्तीमान लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित झाले असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  कोथरूड सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अवमान विरोधात निषेध आंदोलन

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जे आरोप झाले, त्याचही उत्तर दिलं. मतदार याद्यात फेरफार, काही मतदारसंघात 50 हजार मतदार वाढले, ईव्हीएम हॅक होऊ शकत का? किंवा बॅटरी असे वेगवेगळे आरोप झाले. पण EVM कधीही हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडचा आरोप निराधार आहे. ईव्हीएममध्ये वायरस किंवा बग नाही. ईव्हीएम फूलप्रूफ डिवाईस आहे” असं स्पष्टपणे सांगितलं. निवडणूक हरल्यानंतर जे आरोप होतात ते त्यांनी खोडून काढले.