‘मग मला आणखी एक लाख मते मिळायला हवी होती…’, छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचा दावा केला आहे. राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. ज्या वेळेस 3 पक्षांची युती असते तेव्हा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. त्या निर्णयासाठी काही वेळेस महिना, महिना देखील लागला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन-चार दिवसांत शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भातील फॉर्म्युला आज निश्चित होणार आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

फडणवीस यांचे भरभरुन कौतूक
भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरुन काम करणार असल्याचे सांगितले. परंतु पक्षाने आदेश दिला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी पूर्णपणे कामाला झोकवून दिले. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  सुनेत्रावहिनी पवारांची साहेबांच्या ६दशकांच्या प्रवासासाठी खास पोस्ट!; साहेबांचे मार्गदर्शन प्रेरणा आगामी काळातही…

मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही
ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मी काम केले. त्यामुळे काही लोक मला प्रचंड टार्गेट करत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीत मनोज जरांगे स्वत: माझ्या मतदार संघात फिरत होते. रात्री 2 वाजेपर्यंत ते बैठका घेत होते. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. मला एका मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही.

लाखाचे मताधिक्य हवे होते
ईव्हीएमवर घोळाचा आरोपाला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. आता त्याच्यात गडबड आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणे सोपे आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मला 56 हजारांचे मताधिक्य होते. मग आता माझे मतदान 2 लाखांपर्यंत जायला हवे होते. ईव्हीएममध्ये गडबड असती तर मला एक लाख जास्त मते मिळायला हवी होती. मग माझे मताधिक्य कमी का झाले? असे भुजबळ यांनी सांगितले.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?