महाविकास आघाडीतही आज अंतिम निर्णय होणार; या जागांची ‘रस्सीखेच’क्लिष्ट; वडीलकीचा शब्द कामी येणार?

0

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर आज बैठक होत असून यात जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील सुमारे 90% जागांची विभागणी पूर्ण झाली असून महाविकास आघाडीचं 260 जागांचं जागावाटप ठरलं असून उर्वरित 28 जागांवर मात्र अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र आजच महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या निवडणूक आयोगाने साचेबंध कार्यक्रम जाहीर केल्यामुळे जागा वाटपाचा तिढा दोन्ही आघाड्यांना त्वरित यादी सोडवण्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या 100 जणांची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ही आपापसात सामंजस्याने विभागणी झालेल्या 260 पैकी किमान 150 जागांची यादी जाहीर होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा बघायला मिळत आहे.

अधिक वाचा  मराठा विद्यार्थ्यांना ‘ओबीसी’प्रमाणे सवलती मिळणार; राज्य सरकारचा निर्णय; जीआरही निघाला

जागावाटपाचं गणित काही केल्या सुटत नसल्याचं दिसत आहे. परंतु राज्यात अनपेक्षित पणे एक टप्प्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे बरी प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी व बंडखोरांना आळा बसवण्यासाठी सर्वच पक्षांकडून यादी जाहीर करून बंडखोरी शमवण्यासाठी राखीव वेळ ठेवण्याची तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत 288 पैकी 260 जागांवर अंतिम जागावाटपावर निर्णय झाला असून उरलेल्या 28 जागांवर अजूनही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या सत्रामध्ये सध्या शरद पवार वरील की च्या नात्याने लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली असून या अडचणीच्या 28 जागांची विभागणी ही त्यांच्यामार्फत वडीलकीच्या नात्याने सामंजस्याने करण्याची शक्यता आहे. याबाबत आजच निर्णय होऊन जागावाटप निश्चित होण्याची मोठी शक्यता आहे.

अधिक वाचा  भारतीय अर्थव्यवस्था सदृढ युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही आर्थिक वर्ष 26 मध्ये 7.7%  जीडीपीची वाढ

…यामुळे मविआच्या 38 जागा अडकल्या-

या महत्वाच्या 28 जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा तर करण्यात आला आहेच; परंतु महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे छोटे पक्षांनीही या जागांवरती दावा केल्यामुळे तिढा अधिक क्लीस्ट झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यात मुंबई आणि विदर्भातील मोठ्या जागांचा समावेश आहे. यात छोट्या घटक पक्षांना देखील जागा देण्याबाबत दबाव असल्याने हा तिढा सुटत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आज अंतिम निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.