राज्यात महायुती धोक्यात? भाजप पराभवास हे कारण; मला पदमुक्त करा फडणवीसांची मागणी

0

राज्यात महाविकास आघाडीने लोकसभेत मोठी मुसंडी मारली. त्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार प्रदर्शन केले. तर भाजपला राज्यात मोठा फटका बसला. भाजपने लोकसभेसाठी मोठी कंबर कसली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात तळ ठोकून होते. अनेक प्रचार सभा, रॅली आणि तळागळापर्यंत मजबुत संघटन असताना विशेष कामगिरी बजावता न आल्याने त्याचे भाजपने विश्लेषण सुरु केले आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची झालेले हानी भरून काढण्यासाठी मला पद मुक्त होण्याची गरज असून केंद्रीय नेतृत्व आणि त्यास परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

राज्यामध्ये सध्या विकासापेक्षा नरेटिव्ह सेट करण्याचे राजकारण जोरात सुरू असून त्याला आळा घालण्याचे काम करण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे त्यामुळे पक्ष नेतृत्वाने याबाबत गंभीर विचार करावा असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मत मांडले. मुळात देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टपायी राज्यात तोडफोड करून पक्ष उध्वस्त करण्याचे काम केलेले असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनीच यातून ‘क्विट’ होण्याची केलेली मागणी राज्यातील महायुतीचे सरकार धोक्यात आहे? याचे संकेत देत आहेत. अशी चर्चा सुरू झालेली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राज्यात उत्तम संघटन कौशल्य असलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष यांच्याकडे पाहिले जात असतानाही भारतीय जनता पक्षाची स्वतःची एक आकडी (९) जागांची विजयी कामगिरी ही सध्या कार्यरत असलेल्या कार्यकारणीसाठी अत्यंत लाजरवाणी आहे. राज्यात सत्तेत राहण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाने गमावला आहे असा विरोधकांकडून आरोप केलेला जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त होण्याची केलेली इच्छा खरंच केंद्रीय पातळीवरती काहीतरी नवीन सुरू आहे की काय या चर्चांना उधाण देत आहे.

देशात एनडीचे सरकार

पंडित नेहरूनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदींना मिळाला आहे. भारतामध्ये एनडीएचं सरकार येतंय. हा ऐतिहासिक क्षण आहे. ६२ नंतर पहिल्यांदाच असं घडत आहे. ओडिसात पहिल्यांदा भाजपचं सरकार येत आहे. आंध्रप्रदेशातही चंद्रबाबूंच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार येत आहे. अरुणाचलमध्ये भाजपचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीतही जनतेने भाजप आणि एनडीएला कौल दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

इंडिया आघाडीपेक्षा तर भाजपला जास्त जागा

इंडिया आघाडी तयार झाली. त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठी रणनीती केली. पण तरीही भाजप त्यांच्या पेक्षा मोठी राहिली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. भाजप आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून सरकार तयार होत आहे.

या फॅक्टरने बिघडवला ‘खेळ’

महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश आलं नाही. किंबहुना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा महाराष्ट्रात मिळाल्या. राज्यात आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. काही प्रमाणात नरेटिव्हच्या विरोधात लढावं लागेल. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. तो नरेटिव्ह ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही. हे खरं आहे, असे सांगत फडणवीसांनी या संविधान, घटना बदलण्याचे जे नरेटिव्ह तयार करण्यात आलं. त्यामुळे मोठा फटका बसल्याचे मत मांडले. जनादेश शिरसांवद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त जागा मिळालेल्या महाविकास आघाडीचं त्यांनी अभिनंदन केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार