महाराष्ट्राच्या राजकारणावर बीआरएसच्या एन्ट्रीनं परिणाम?; बावनकुळे ‘हे’ म्हणाले

0

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीवर भाष्य केलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहे. राजकारणात कोणीही नवं आलं की बी टीम. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती आमची बी टीम नाही. नवीन पक्षाची भीती पवार आणि काँग्रेस ला वाटते.बीआरएसशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं बावनकुळे म्हणालेत.

एका परिवारातल्या दोन भावांमध्ये काही कारणाने मतभेद होत असतात. पण फेविकॉल का जोड पक्का आहे. शिवसेना-भाजपचा जोड फेविकॉलचा आहे. तो कधीही तुटणार नाही, असं बावनकुळे म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल, असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी भाष्य केलंय.

अधिक वाचा  पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा! पुणे रिंगरोड पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

भाजपचा प्लॅन जयंत पाटलांनी माहित झालं असेल तर काय.. .गोपनीय पद्धतीने भाजपच्या बैठकीला जयंत पाटील आले असतील. ते कसे आले कुठे आले त्यांना विचारा, असं म्हणत जयंत पाटलांनाही बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. 2014 ते 2019 च्या निवडणुकांमध्ये जो जाहीरनामा दिला गेला त्याप्रमाणे सरकारने काय काम केलं ते राज्यातल्या 3 कोटी घरापर्यंत पोहोचणार आहोत.संपर्क ते समर्थन आणि घर चलो अभियान, संपर्क ते समर्थनमध्ये आम्ही महत्वाच्या 1 हजार लोकांचा घरी भेटी देतो आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

टिफिन बैठकीतून संवाद साधणार आहोत. प्रत्येकाने घरून टिफीन आणला आहे, ही आमची टिफिन बैठक आहे, असंही ते म्हणालेत.

कर्नाटकला काँग्रेसला मिळालेलं एक मत किती धोकादायक आहे, हे उद्धव ठाकरे यांना कळालं आहे. राहुल गांधी यांचा सांगण्यावरून त्यांनी सावरकर धडा काढला. धर्मांतर कायदा बदलला. उद्धव ठाकरे लंडनमध्ये काँग्रेस देश विरोधी उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? कालपासून उत्तर मिळालेलं नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना आमच्या युतीवर परिणाम करू शकत नाही.2024 मध्ये दिसेल सेना सोबत राहतील आणि आहेच. थोडा गैरसमज किंवा समज त्यामुळे काही फरक पडणार नाही.अतिउत्साही कार्यकर्ते असतात. भावनेचा भरात कोणी काही करतं-बोलतं. मी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या जाहिरातीला दुसऱ्या जाहिरातीने नष्ट केलं, असं बावनकुळे म्हणालेत.

अधिक वाचा  शाळेच्या पाहणीसाठी जाताच अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांना मारहाण; गावकऱ्यांचा हल्ला काचाही फोडल्या