महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटी पाऊस एन्ट्री मारणार, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

0

राज्यात सर्वदूर अपेक्षित पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतला आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली.”राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. योगायोगाने हे स्वाती नक्षत्र आहे. एक म्हण आहे, पडतील स्वातीत तर पिकतील मोती. तशीच परिस्थिती होणार आहे. शेवटच्या आठवड्यात 25 ते 28 ऑगस्ट या काळात पाऊस पडणार आहे”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

25 ते 28 तारेखदरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार?

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, नांदेड, बीड, जालना, जळगाव जामोद, पैठण, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड या भागांमध्ये पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पडणारा पाऊस हा पिकांसाठी खूप दिलासादायक ठरणार आहे. स्वाती नक्षत्रातील पाऊस पिकांसाठी महत्ताचा असतो.

परभणीत 60 ते 70 गावांमध्ये पावसाची शक्यता

परभणी जिल्ह्यात 849 गावे आहेत. त्यापैकी 60 ते 70 गावांमध्ये पाऊस पडेल. काही भाग वंचित राहील. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नाही. पाऊस विखुरलेला स्वरुपात पडणार आहे. 25 ते 28 ऑगस्ट या काळातला पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. त्याचे स्वरुप रिमझिम असणार आहे. कुठे ऊन पडेल, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडणार आहे

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपीला जेवण किंवा जागा देणे म्हणजे गुन्हा नाही युक्तीवाद कामी निर्दोष सुटका

पुढच्या दोन दिवसांत कुठे-कुठे पावसाची शक्यता?

राज्यात सोलापूर, सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट या भागात 23 ऑगस्टला दुपारनंतर संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पावसाची शक्यता आहे. श्रीगोंदा, अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये रिमझिम पाऊस सुरु राहणार आहे. राधानगरी ते पालघरपर्यंत सरीवर सरी सुरु राहतील. पुण्यातही सरी सुरु राहतील.

25 ते 27 ऑगस्ट काळात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

पुढच्या तीन दिवसांत विदर्भात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. अमरावतीत 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोट या परिसरात 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान ओढे, नाले वाहतील इतक्या पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी रात्री पावसाची शक्यता आहे. वंचित भाग राहिलेल्या धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड जिल्ह्याचा काही भाग, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी चांगल्या पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा  पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद; मंत्री जयकुमार गोरे यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार