मुंबई, पुण्याकडे कंपन्यांनी फिरवली पाठ! कार्यालयीन जागांना घरघर लागल्याचे चित्र

0

देशातील महानगरांमध्ये मुंबई आणि पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्यालयीन जागांच्या मागणीत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट नोंदविण्यात आली आहे. कार्यालयीन जागांच्या मागणीला चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत घरघर लागल्याचे चित्र आहे. जागतिक पातळीवरील व्यापारातील अडथळे आणि आर्थिक अनिश्चितता यांचा परिणाम कार्यालयीन जागांच्या मागणीवर प्रामुख्याने झाला आहे. कंपन्यांकडून कार्यालयीन जागांची मागणी कमी झाल्याचे समोर आले आहे.

कॉलिअर्स इंडियाने देशातील महानगरांतील कार्यालयीन जागांच्या मागणीचा एप्रिल ते जून तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भाडेतत्वावरील कार्यालयीन जागांचे १ कोटी ७४ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे व्यवहार १ कोटी ७८ लाख चौरस फूट होते. त्यात आता २ टक्क्यांची घट झाली आहे. मुंबईत कार्यालयीन जागांचे २० लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के घट झाली आहे. पुण्यात कार्यालयीन जागांचे १२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

अधिक वाचा  केतन अग्रवाल हत्याकांड आरोपी ‘सिया’ची वकील पहिल्यांदाच समोर अन् एका वाक्यात विषय संपवला

देशातील महानगरांमध्ये दुसऱ्या तिमाहीत नवीन कार्यालयीन जागांच्या पुरवठ्यातही मोठी घट झाली आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत कार्यालयीन जागांचा पुरवठा १ कोटी ७ लाख चौरस फूट झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ कोटी ४९ लाख चौरस फूट होता. त्यात आता २८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. मुंबईत मात्र कार्यालयीन जागांच्या पुरवठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, तो २१ लाख चौरस फूट झाला आहे. पुण्यात कार्यालयीन जागांच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५८ टक्के घट झाली असून, तो १४ लाख चौरस फूट झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

अधिक वाचा  पुण्यातील समाविष्ट 23 गावांचा विकास महापालिकेचा मोठा निर्णय; अखेर पाच वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी

कार्यालयीन जागांचे व्यवहार (लाख चौरस फुटांमध्ये)

महानगर – एप्रिल ते जून २०२५ – एप्रिल ते जून २०२६

मुंबई – २८ – २०

पुणे – १६ – १२

बंगळुरू – ४८ – ५२

चेन्नई – २६ – २०

दिल्ली – २२ – २७

हैदराबाद – ३२ – ३८

कोलकता – ६ – ५

जागतिक पातळीवरील संकटाचा परिणाम देशातील कार्यालयीन जागांच्या मागणीवर झाला आहे. मात्र, जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जीसीसी) भारताला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यातून ही मागणी काही प्रमाणात कायम राहण्यास मदत झाली आहे. चालू वर्षात कार्यालयीन जागांची मागणी ७ कोटी चौरस फुटांवर जाण्याचा अंदाज आहे. – अर्पित मेहरोत्रा, व्यवस्थापकीय संचालक (कार्यालयीन सेवा), कॉलिअर्स

अधिक वाचा  मोरया मित्र मंडळाची छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विविध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण