अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी मोर्चा नवी मुंबई एकवटली; उद्या भीमसैनिक लाखोच्या संख्येने विधानभवनावर

0

नवी मुंबई दि. २९ (रामदास धो. गमरे) अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. ५० चेंबूर (अ), ५१ चेंबूर (ब), ५२ गोवंडी, ५३ मानखुर्द, ५४ वाशी, ५५ नेरुळ, ५६ कामोठे, ५७ नवीन पनवेल तसेच पनवेल व उरण तालुक्यातील सर्व शाखा पदाधिकारी व गटप्रतिनिधींची संयुक्त नियोजन सभा दि. २८ जून २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सेक्टर-२९, वाशी येथे सभापती आनंदराज आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.

सदर सभेच्या प्रारंभी उपसभापती विनोद मोरे यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची संकल्पना, त्यामागील कारणे तसेच काही घटकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीची पार्श्वभूमी स्पष्ट करत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या संधींवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले. भविष्यातील पिढ्यांच्या शिक्षण, नोकरी आणि घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे सांगत, समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांविरोधात एकजुटीने उभे राहण्याचे सर्वांना आवाहन केले तसेच ३० जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मेट्रो सिनेमा ते विधानभवन, मुंबई दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उपवर्गीकरण विरोधी मोर्चात प्रत्येक कुटुंबातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची एकजूट आणि ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

अधिक वाचा  अभिजीत दिपकेंचा मोठा विजय अखेर सरकार झुकलं; सरकार अलर्ट मोडमध्ये सर्वात मोठा निर्णय 12 500 कोटी मंजूरही केले

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार तथा कामोठे गटप्रतिनिधी नागसेन सुरेश गमरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी आणि भाषाशैलीत केले. सरतेशेवटी सदर सभा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या गटप्रतिनिधी अनिरुद्ध जाधव (चेंबूर-अ), लवेश तांबे (चेंबूर-ब), राजेश सकपाळ (गोवंडी), सुभाष जाधव (मानखुर्द), सी. एम. कासारे (वाशी), मंगेश कासारे (नेरुळ), नागसेन गमरे (कामोठे), प्रमोद तांबे (नवीन पनवेल) तसेच विजय गायकवाड (पनवेल तालुका अध्यक्ष) आणि सुदर्शन जाधव (उरण तालुका अध्यक्ष) यांचे तसेच सभेला उपस्थित सर्व गटांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव आदींचे बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस तथा चेंबूर-ब चे गटप्रतिनिधी लवेश तांबे यांनी आभार मानून सभेची सांगता केली.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश