“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२६, स्वच्छता पूर्व पुरस्कार” अन्वये प्रभाग क्रमांक १०, शास्त्री नगर परिसरात “स्वच्छता पंधरवडा दिन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम सतत १५ दिवस अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर स्वच्छता पंधरवडा दिन जनजागृती मोहिम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. राबवण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या उपक्रमात प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवा, परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर पडणारा कचरा कायम स्वरूपी बंद व्हावा, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या स्वच्छतेच्या अडचणी समजून घेऊन त्यांचा वर्गीकृत केलेला कचरा जमा कसा करता येईल याविषयी नियोजन करण्याच्या सुचना महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक गणेश खिरिड, राम सोनवणे यांनी दिल्या. तसेच सदर कार्यक्रम आरोग्य निरिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी, दत्तात्रय दळवी, उमेश शिंदे मोकादम वैजीनाथ गायकवाड, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, सचिन लोंढे, रोहित जाधव, गणेश चव्हाण ईत्यादीनी कचरा पडणाऱ्या ठिकाणी सडा व रांगोळी काढून परिसर स्वच्छ कसा करता येईल याविषयी सुक्ष्म नियोजन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धार केला आहे.






महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर परिसरातील पी. एम. सी. कॉलनी, साईनाथ वसाहत, मुठेश्वर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, गाढवे कॉलनी, पोष्टमन कॉलनी इत्यादी परिसरातील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, मा. रूपाली ताई पवार, स्थानिक गणेश मंडळे तसेच विविध संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते मा. कैलास मोहोळ, नागेश गायकवाड, सचिन डाकले, बाळू शेडगे, ओंकार ठाकूर जेष्ठ नागरिक राम कोकरे व इतर नागरिक, सफाई सेवक, स्वच्छ सहकारी संस्थेचे मुख्य समन्वयक शिवाजी सकट कोठी समन्वयक अक्षय रूपटके, मंदा रणसिंग, काजल नाईकनवरे, वैशाली घरटे, धनश्री क्षिरसागर, तेजल सावर शिवाय इतर कचरा वेचक स्वच्छता जनजागृती प्रचार फेरी मध्ये सहभागी झाले.
सदर जनजागृती स्वच्छता प्रचार फेरीत सार्वजनिक ठिकाणी मिश्रीत कचरा टाकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, पाणि जपून वापरा, गोवा, गुटखा व तंबाखू खाऊन थुंकू नका, सार्वजनिक आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना साथ करा असे आवाहन करण्यात आले.













