बागेश्वर बाबांचं थेट मुख्यमंत्री, सरसंघचालक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर वाचाळ वक्तव्य; ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले…

0

बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथा बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. नागपुरात भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. “भारतीय सनातनी परंपरेत जन्म घेतल्याने आज आणखी गौरव होत आहे. आम्ही धन्य आहोत, ज्या देशात आम्ही जन्म घेतला तिथे मातृ प्रधानता आहे. अशा देशात भारतदुर्गामाता मंदिरचे भूमीपूजन होत आहे”, असं बागेश्वर बाबा म्हणाले. यानंतर त्यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

अधिक वाचा  पुणे पालिकेचा निर्णय! महिलांना करात ५०% सवलत, या घरांनाच मिळणार लाभ, …अशा आहेत अटी व शर्ती!

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करता करता खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो आहोत. ते एक दिवस समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपले मुकूट उतारले आणि सांगितलं की, आम्ही खूप युद्ध लढलो. आता कृपा करा की, आम्हाला खूप लढायचं नाही. एक मोठी दया करा, हे मुकूट आपण सांभाळा. हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आता आमच्याकडून पुढे चाललं जात नाही. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही आता खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा आहे. आता आम्ही काही दिवस काही करु इच्छित नाहीत”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

अधिक वाचा  भाजप वरळी रॅलीत मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार; ती महिला नेमकी कोण?

“शिवरायांच्या म्हणण्यावर स्मितहास्य करत समर्थ रामदास स्वामी भगवान म्हणाले, ठिक आहे, आम्हाला स्वीकार आहे. पण एक गोष्टी आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आमचे कोण आहात? ते म्हणाले, आम्ही आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत? तर म्हणाले गुरु आहात. मग शिष्यचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामींनी केला. त्यावर जो गुरु आज्ञा देणार त्याचं पालन करण्याचं कर्तव्य शिष्याचं आहे, असं शिवाजी महाराज म्हणाले. समर्थ रामदास स्वामी यांनी मुकूट उठवलं आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालणार. पण आज्ञा तुम्हाला आहे. तुम्हाला संचालन करायचं आहे”, असा धक्कादायक दावा बागेश्वर बाबांनी केला.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांची ‘अजितनिती’ विधान परिषद फक्तं १ जागा त्यातही ही रणनीती; मतदारसंघ अन् परिवार हित अबाधित

“ही घटना सांगून मला सांगायचं आहे की, देवाच्या आज्ञेने भारतमाताच्या आज्ञेने आपल्या सगळ्यांचा गौरव आहे की, अशा महापुरुषाने या भूमीवर जन्म घेतला, वर्तमानात ते संघाचे प्रमुख आहेत. पण त्यांनी भारताच्या गौरवाला विश्वपटलावर विस्थापित करण्यासाठी आपलं जीवन दिलं, तन, मन, आयुष्य दिलं. आम्हाला विश्वास आहे की, ज्यादिवशी भारतमाता दुर्गामंदिर बनेल त्यादिवशी भारत शक्ती संपन्न होईल आणि अखंड भारत होईल”, असं बागेश्वर बाबा तथा धीरेंद्र शास्त्री म्हणाले.