पालघर जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0

पालघर दि. २० (रामदास धो. गमरे) आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ “आम्ही भारताचे लोक” यांच्या वतीने जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आलेला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. सामाजिक जागृती, महिला सक्षमीकरण आणि बौद्धिक संवाद यांचा संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

सदर कार्यक्रमास मिलिंद भदाणे (पालघर), प्रा. अजय मोहिते व अवंती मोहिते (नायगाव) तसेच शोभा वाघमारे (दहिसर) यांनी विशेष उपस्थिती लावून महिलांना विविध सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि स्वाभिमानाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. तसेच ॲड. आदिती पवार यांनी महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन करत न्यायव्यवस्थेतील अधिकारांची माहिती दिली, त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

अधिक वाचा  बालभारतीची नवी पुस्तके हायटेक! क्यूआर कोडद्वारे ई-साहित्यही; ‘चाइल्ड हेल्पलाइन’ ‘टेली मानस’; या अभ्यासक्रमात झाले मोठे बदल

सदर प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. यामुळे उपस्थित महिलांना प्रेरणा मिळाली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन सुकलाल सर, संतोष म्हस्के, अमोल पवार आणि जयेश कदम यांनी अत्यंत सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. रोहन सोनावले व सौ. सोनावले यांनी महिलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले; तसेच या कार्यक्रमासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देत त्यांनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी ठरला. अशा उपक्रमांमुळे समाजात महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार अधिक व्यापकपणे पोहोचत राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस