पुणे महापालिकेची अभय योजनेतून ९५५ कोटींची वसुली; शेवटच्या दिवशी २५ कोटींचा भरणा तब्बल ८०० कोटीची करमाफी

0

पुणे महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून प्रशासनाने ९५४ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली केली आहे. पण या १ लाख ६४ हजार ६६५ थकबाकीदारांचा तब्बल ७९२ कोटी २१ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या विकास कामांना, नवीन प्रकल्प, रस्ते करण्यासाठी भूसंपादनाची गरज आहे. पण त्यासाठी पुरेसा निधी शिल्लक नाही. निधी उभारणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पण त्यास जास्त प्रतिसाद नव्हते. अनेकांनी पैसे न भरल्याने पुन्हा एका महिन्याची म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ द्यावी असा ठराव दिला होता. पण तो फेटाळण्यात आला आहे.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

महापालिकेच्या हद्दीत एकूण ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींवर तब्बल १३ हजार ९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात समाविष्ट गावांमधील सुमारे २ हजार कोटी, मोबाईल टॉवरवरील ४ हजार २५० कोटी आणि जुन्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर वसुली वाढविण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली होती. रविवारी (ता. १५) या योजनेची मुदत संपली. त्यामध्ये एकूण चार महिन्यांत १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत ९५४ कोटी ७८ लाख रुपये महापालिकेकडे जमा केले. मात्र या सवलतीमुळे ७९२ कोटी २१ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.

अधिक वाचा  कर्वेनगर प्रभागात मा. महापौर आणि मा. आयुक्त संयुक्त दौरा; नगरसेवक स्वप्नील दुधानेंची ‘सुचक’ मांडणी प्रशासनही भारावले

या चार महिन्यांत अभय योजनेचे लाभार्थी नसलेले पण नियमीत कर भरणा करणाऱ्या १९ हजार ३२१ मिळकतधारकांनी ११५ कोटी ५७ लाख रुपये कर भरला. त्यामुळे एकूण १ लाख ८३ हजार ९८६ मिळकतधारकांकडून सुमारे १ हजार ७० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती मिळकतकर विभागप्रमुख रवि पवार यांनी दिली.

शेवटच्या दिवशी २५ कोटींची वसुली

अभय योजनेच्या शेवटच्या दिवशी १५ मार्च रोजी २ हजार ५६० मिळकतधारकांनी २४ कोटी ३६ लाख रुपये कर भरला. तर १६८ मिळकतधारकांनी १ कोटी ५१ लाख रुपये कर भरला. त्यामुळे एका दिवसात एकूण २५ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली झाली.

अधिक वाचा  राज्यासह देशात दुष्काळाचा धोका वाढला; देशभरात पावसाची १३% तूट पावसाचं चित्र सप्टेंबरमध्ये कसं? स्कायमेटचा अंदाज

अभय योजनेचे लाभार्थी व भरलेली रक्कम

१५ मार्च रोजीचा भरणा २,५०६० – २४.३६ कोटी रुपये

१५ नोव्हेंबर ते १५ मार्चचा भरणा १.६४ लाख – ९५४.७८ कोटी

अभय योजनेचा लाभ न घेता कर भरणा करणारे

१५ मार्च रोजीचा भरणा १६८  – १.५१ कोटी रुपये

१५ नोव्हेंबर ते १५ मार्च भरणा १९,३२१ -९५४.७८ कोटी रुपये