दहावीचा गणिताचा पेपर ३ दिवस आधीच टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिह्न

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तीन दिवस आधीच टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका टेलिग्राम ग्रुपवर गणिताचे दोन्ही पेपर (भाग-१ आणि भाग-२) पोस्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे, गणित भाग-२ चा पेपर परीक्षेच्या तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध झाला होता. सुरुवातीला हे फक्त अफवा असल्याचे मानले जात होते, परंतु पुणे विभागीय मंडळाने हे प्रकरण गांभीर्याने घेत दोन्ही प्रश्नपत्रिकांची अधिकृत आणि व्हायरल झालेल्या आवृत्तीची तुलना केली. या पडताळणीत दोन्ही पूर्णपणे जुळल्याचे निष्कर्ष निघाले आहेत. यामुळे पेपर फुटीची पुष्टी झाली असून बोर्डाच्या पेपर सुरक्षितता व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अधिक वाचा  काँग्रेससाठी दिलासादायक वृत्त! प्रवक्ते होण्यासाठी प्रथमच तब्बल 5000 प्रज्ञावंतांचे अर्ज; २५० इच्छुकांच्या मुलाखती लवकरच घोषणा

या प्रकरणाची दखल घेत पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पेपर नेमका कुठून आणि कोणत्या माध्यमातून लीक झाला,याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगवान हालचाली सुरू आहेत.सायबर सेलच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू केला आहे.

बारावीचाही पेपर फुटला

यापूर्वी बारावीच्या परीक्षेतही नागपूर विभागात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचे पेपर व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर व्हायरल झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, दहावीच्या पेपर फुटीने आता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न निर्माण केला आहे.

अधिक वाचा  बागेश्वर बाबांचं थेट मुख्यमंत्री, सरसंघचालक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर वाचाळ वक्तव्य; ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले…