पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने दोन्ही पक्षांनी सगळ्याच जागांवर एबी फॉर्म वाटप केले आहे. परंतु भाजपने नाकारलेल्या असंख्य उमेदवारांनी महायुतीचेच मित्रपक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्याकडे जात आपली वेळ साध्य करण्याचा! नवा मार्ग अवलंबल्याने भाजपची मोठी निर्माण झाली आहे. एकीकडे तुल्यबळ उमेदवार सहज अलगद गळाला लागल्याने प्रमुख विरोधक असलेल्या अजितदादा बाहुबली झाले तर पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या चारही (भाजपा, शिवसेना, शिवसेना(उबाठा), मनसे)पक्षाचे उमेदवार मत पेटी वरती येणार असल्याने भाजपची मोठी अडचण निर्माण झाली आहे.






शिवसेना आणि मनसे ही बहुप्रतिक्षित असलेली युती झाल्याने उत्साह संचारलेल्या कार्यकर्त्यांना पुणे शहरात सर्वात प्रथमच उत्तम संधी निर्माण झाली आहे. आतापर्यंत पुण्यात किती एबी फॉर्म भरले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरीसुद्धा संपूर्ण पुणे शहरात भाजपची कसोटी ठरलेली आहे. बालेकिल्ले समजले जाणारे मतदारसंघातील प्रभाग सुद्धा अडचणीत आले आहेत. नाराज माजी नगरसेवक अजितदादांच्या गळाला, नवीन चेहरे रणांगणात आणि विरोधकांची मोट सक्षम अशा तिहेरी संकटामध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जाते यावर भारतीय जनता पक्षाची गणिते अवलंबून राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाची विकासाची पाटी पक्ष प्रवेशामुळे गहाण अशा स्थितीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेतील पदाधिकऱ्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्याने भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम निर्माण केला.
पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली की अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा चालू राहणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेच्या या दाव्यामागे आता वेगळीच रणनीती असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कुठेतरी हा रोष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. उदय सामंत यांनीही “पुण्यात महायुतीचे जागावाटप ‘सिक्रेट’ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत अंतिम निर्णय होईल. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीच्या आत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल,” असा दावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची बैठक होऊन निर्णय होणार आहे. या बैठकीत तोडगा निघेल अशी नेत्यांना अपेक्षा आहे. एबी फॉर्म सर्वांना वाटले असले तरी पक्षाच्या वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणार? त्यामुळे एकीकडे भाजपावर दबाव आणि दुसरीकडे रोष कमी करण्यासाठी एबी फॉर्म वाटप ची स्ट्रॅटर्जी अंगलट येते की यशस्वी होणार हे आगामी दिवसात स्पष्ट होईल.











