बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची ४२८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. १३ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती मुख्य कार्यालय भोईवाडा राजमाता जिजाऊ भोसले यांचा ४२८ वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल मुंबई १२ येथे उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर प्रसंगी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक सादर करीत असताना जिजाऊंच्या जीवनपटाचा आढावा घेत असताना “धैर्य, विवेक आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने आकार देत या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा देण्याचे महत्कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे त्या केवळ जननी म्हणून नव्हे तर स्वराज्य घडवणारी दूरदृष्टी देणारी प्रेरणास्थान होत्या, अन्यायाविरुद्ध लढा देण्याच व समाजाला नैतिक मार्गाने दिशा देण्याच बाळकडू त्यांनी शिवाजी महाराजांना दिलं म्हणून शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या खऱ्या गुरू या जिजाऊ होत. लहापणापासूनच महाराजांना सैनिकी शिक्षण, तलवारबाजी, मुत्सद्दीपणा, शौर्य, राजकारण यांचे शिक्षण देऊन त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करून स्वराज्याला बळकटी देण्याच काम केले म्हणून शिवाजी महाराज जर स्वराज्याचा कळस असतील तर खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया हा राजमाता जिजाऊ होत्या” असे नमूद केले.

अधिक वाचा  कोथरूड सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अवमान विरोधात निषेध आंदोलन

अध्यक्षीय भाषणात उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी “सिंदखेराजा, बुलढाणा येथे लखोजी जाधव यांच्या पोटी १२ जानेवारी १५५८ साली एक महान कन्यारत्न जन्मले त्या म्हणजेच राजमाता जिजाऊ. शिवाजी महाराजांना घडविताना त्यांना तलवारबाजी पासून, राजकारण, समाजकारण, राज्य कसे चालवावे, त्याचा विस्तार कसा करावा, रयतेचा सांभाळ कसा करावा अश्या अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी महाराजांना शिकविल्या व त्यासाठी प्रसंगी आपल्या सर्व सुखांचा त्यांनी त्याग केला, त्यामुळेच बलाढ्य शत्रूंना तोड देऊन व परकीय आक्रमणाना परतवून लावून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली, म्हणून स्वराज्य निर्मितीत जिजाऊंचा मोलाचा वाटा आहे” असे नमूद करून त्यांनी जिजाऊंना अभिवादन केले.

अधिक वाचा  ”ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम”, बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, सचिव यशवंत कदम, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अशोक कदम, गायकवाड, चिटणीस रवींद्र शिंदे, प्रदीप कांबळे, राहुल कदम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती त्या सर्वांनी जिजाऊंच्या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. सरतेशेवटी सर्वांचे आभार मानून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.