”देशमुख हत्याप्रकरणाचा तपास आता पूर्ण झालाय, आरोपींना पश्चाताप होतोय” आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा

0

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात बीड पोलिसांच्या विशेष पथकाने मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली. कुष्णा आंधळे नावाचा आणखी एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना केजच्या कोर्टात हजर करण्यात आलं.

आरोपींचे वकील ए.व्ही. तिडके यांनी कोर्टामध्ये आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला असून या प्रकरणातला तपास जवळपास पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय आरोपींना झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाल्याचं नमूद केलं. याविरोधात मात्र एसआयटीने आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केलीय.

अधिक वाचा  असंख्य दिव्यांगांच्या आयुष्यात नवी पहाट! पुन्हा उमलले हासू; ना. चंद्रकांतदादा यांची अशी ही संवेदनशीलता

आरोपींच्या वकिलांनी केज कोर्टात केलेल्या युक्तिवादामध्ये ९५ टक्के तपास झाल्याचं म्हटलं. केवळ कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. आतापर्यंतचा तपास पूर्ण झाला असून इतर सर्व संबंध संपुष्टात येत आहेत, असंही आरोपीच्या वकिलाना कोर्टाला सांगितलं.

सीआयडीचे पोलिस अधिकारी मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते. आरोपींना पश्चाताप झाला, असं म्हणता येणार नाही असं सीआयडीने नमूद केलं. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून आरोपींना मोक्का लागला पाहिजे, संघटित गुन्हेगारी, कट रचणे त्यामुळे आरोपींना पंधरा दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली.

याशिवाय आरोपींचं पुणे कनेक्शन, आरोपाशी संबंधित इतर धागेदोरे एसआयटीला आणि सीआयडीला तपासायचे आहेत. एसआयटीने कोर्टात नमूद केलं की, मयत संतोष देशमुख यांचा चुलत भाऊ शिवराज देशमुख हा अपहरणावेळी गाडीत होता. तो नसता तर संतोष यांचा मृतदेह सापडला नसता. अशी मांडणी सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांनी केली.

अधिक वाचा  शरद पवारांचा ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅनही रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट