भारतीय संविधान अमृत महोत्सव औचित्य; कोरेगाव भिमा जय स्तंभ:यांचे तेलचित्र अशोक चक्र यंदा विशेष सजावट

0

पुणे : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षे त्यानिमित्त विवेक बनसोडे यांच्या संकल्पनेतून बार्टी महासंचालक सुनिल वारे, निबंधक इंदिरा आस्वार यांच्या मान्यतेने मा. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने १ जानेवारी २०२५ च्या शौर्यदिनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र अशोका चक्र असलेला निळा ध्वज,जय भिम घोषवाक्य विजय स्तंभच्या सजावटी मधे दिसणार आहे. यासाठी विशेष प्रयत्न कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेरावभाऊ वाघमारे, रिपब्लिकन विध्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले. यदाच्या सजावटी विशेष महत्व आहे पंचशीलच्या चौकटीत भारतीय संविधानाची उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेलचित्र, आसणारा आहे त्यावरती जय भिम घोषवाक्य सह निळा ध्वज, आसा अनोखा संगम आपणास पहिला मिळेल.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भारताचे संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीक असलेला निळ्या रंगाचा ध्वज आहे. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः नवयानी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद निळा असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे, कारण आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी आजीवन समतेसाठी संघर्ष केला आणि त्यामुळे निळा रंग हा या ध्वजाचा रंग स्वीकारलेला गेला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

निळा ध्वज हा आंबेडकरी चळवाळीची अस्मिता मानला जातो, तसेच निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतिक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते. अनेकदा ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात.

यंदा विजय स्तंभाची सजावट भारतीय संविधानच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून करण्यात आली असल्याचे विवेक बनसोडे, सर्जेरावभाऊ वाघमारे, युवराज बनसोडे यांच्या वतीने सांगण्यात आले.