अखेर चाहत्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा संपणार, ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार

0

आपल्या सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे पडद्यावर येतात आणि जातात आणि त्या चित्रपटांची चर्चा देखील जास्त होत नाही. त्यात काही चित्रपट असे असतात ज्यांच्या रिलीजनंतर चित्रपट पाहिल्यावर लोक दिवसरात्र त्यावर चर्चा करताना दिसतात. त्यानंतर त्या चित्रपटाचा पुढचा भाग येण्याची वाट पाहतात. अश्यातच आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो असाच एक चित्रपट आहे. ज्याच्या तिसरा भाग प्रदर्शित होण्याची लोकं खूप वाट पाहत आहेत. तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. हा चित्रपटच मजेदार तर आहेच, शिवाय विशेष प्रतीक्षा ही क्लायमॅक्स सीनची असणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टचा शेवट एवढ्या रोमांचक वळणावर झाला की प्रेक्षक तो सीन कधीच विसरू शकणार नाहीत. आणि इतक्या वर्षांनंतरही त्या वेळेस नेमकी काय घडले हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.

अधिक वाचा  सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची नवीन पॉलिसी; कार्यालयातील टक्केवारीनुसार असेल बदलीचा प्राधान्यक्रम

कोणता आहे हा चित्रपट आणि त्यातील शेवटचा सीन?

१८ वर्षांपासून प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असलेला चित्रपट तो म्हणजे फिर हेरा फेरी. हा चित्रपट हेराफेरी चित्रपटाचा सिक्वेल होता. तसेच तुम्हा सगळ्यांना या चित्रपटाचा शेवटचा सीन कोणता होता हे नक्कीच आठवत असेल. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये अक्षय कुमार एका पुलाच्या कठड्यावर अडकलेला दिसत आहे. कारण या सीनमध्ये परेश रावल व सुनील शेट्टी यांनी अक्षय कुमारला फोन करताना दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमार हा पुलाच्या कठड्यावर फोन उचलनाच्या नादात तर दुसरीकडे हातात असलेलं सामान पुलाच्या खाली वाहत्या पाण्यात पडू नये यासाठी होणारी कसरत यात दिसत आहे. सामान वाचवण्याच्या नादात फोन थेट पाण्यात पडेल की हातातले सामान याचा व त्यानंतर काय होईल याचा खुलासा चित्रपटाच्या तिसऱ्या भागातच होणार आहे.

अधिक वाचा  सरकारचा मास्टरस्ट्रोक! रातोरात ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ निघाला अध्यादेश, देशभरात महिला आरक्षण लागू, पण अजून ट्विस्ट बाकी

तिसऱ्या भागाची तयारी जोरात
फिर हेरा फेरी या चित्रपटाचा तिसरा भाग २०२५ मध्येच प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, असरानी आणि गुलशन ग्रोव्हर सारखे कलाकारही होते. तर २००६ साली हेरा फेरी 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात मुख्य कलाकारांव्यतिरिक्त जॉनी लिव्हर, बिपाशा बसू आणि रिमी सेन देखील दिसले होते. तर येणाऱ्या आगामी चित्रपटात नेमकी काय घडणार आहे. याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाचा तिसरा पार्ट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

अधिक वाचा  राज्यावर दुहेरी संकट उष्ण लाटेचाही ‘येलो अलर्ट’ जारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर