त्यांचं संतुलन बिघडलं असावं 400 पार वल्गनाच; भाजप फक्तं एवढ्याच जागी? पवारांचा मोदींवर थेट हल्ला

0

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला किती जागा मिळतील याबद्दल शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. पवारांनी जागांचा आकडा सांगितला आहे. इंडियन एक्स्प्रेसला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजीही व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांनी भटकती आत्मा म्हणत शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या विधानाबद्दल शरद पवार म्हणाले की, “त्यांचं संतुलन बिघडलं असावं. कारण आतापर्यंत कोणतेही पंतप्रधान अशा पद्धतीने बोलले नाहीत.”

भाजप-एनडीएला किती जागा मिळतील? पवार म्हणतात…

“भाजप प्रणित एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत २३० किंवा २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही”, असा राजकीय अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  शरद पवार अजितदादांची अंतिम इच्छापूर्ती करणार का? अजित पवारही होते आग्रही; 16 जानेला चर्चाही झाली

याबद्दल अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, “त्यांनी (मोदी सरकार) दिल्लीच्या मुख्यमंत्र्‍यांवर केलेल्या कारवाईमुळे पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यात संताप आहे. त्यांना दक्षिणेकडील राज्यांत किंवा पश्चिम बंगाल किंवा अल्पसंख्यांकांची मते आणि इतर मते मिळणार नाही. मला व्यक्तीशः असं वाटतं की, ते (भाजप प्रणित एनडीए) 230-240 जागा ओलांडू शकणार नाहीत.”

‘सूरतमध्ये जे घडलं ते बेकायदेशीर’, पवारांची टीका

“भाजपने चंदीगड आणि सूरत मध्ये जे केलं, ते चुकीचंच नाही, तर बेकायदेशीर आहे. ३० जानेवारी रोजी निवडणूक अधिकाऱ्याने आप-काँग्रेसची ८ मते अवैध घोषित केली आणि भाजपने चंदीगड महापौर निवडणुकीत विजय मिळवला. सुप्रीम कोर्टाने नंतर हा निकाल रद्द केला आणि आपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले”, असे शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  देशात UGC ची कारवाई! ३२ बनावट विद्यापीठे जाहीर; १२ विद्यापीठे या राज्यात महाराष्ट्राच्या २ संस्था समाविष्ट

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “काँग्रेस उमेदवारांचा अर्ज फेटाळल्यानंतर आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सूरतमध्ये भाजपच्या लोकसभा उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.”

काँग्रेस जाहीरनामा मोडून-तोडून सांगतात:पवारांची टीका

“आता ते इतके घसरले आहेत की, काँग्रेसचा जाहीरनामा तोडून मोडून सांगत आहेत आणि आरक्षण व संविधानाशी छेडछाड केली जाईल अशी भाषा करत आहेत. जाहिरानाम्यात हे कुठे लिहिलेलं आहे? ते कपोलकल्पित गोष्टी सांगत असतात”, अशी टीका शरद पवार यांनी केली