पुण्यातील मिठाई दुकानावर कारवाई तुकाराम मुंढेंना महागात पडली! हायकोर्टाचे 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

0

अन्न सुरक्षा आयुक्त आणि वादग्रस्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना मोठा झटका बसला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हातात घेतल्यापासून तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका लावला. सेफ फूड, सेफ ड्रग्स, सेफ महाराष्ट्र या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरात धडक कारवाई सुरु आहे. दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरु आहे. पुण्यातील मिठाई दुकानावरील कारवाई तुकाराम मुंढे यांना महागात पडली आहे. हायकोर्टाने 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश FDA ला दिले आहेत.

पुण्यातील शेकडो हॉटेल्स आणि दुकानांवर FDA ने कारवाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले आहे. पुण्यातील एका दुकानावर कारवाई करणे FDA ला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. या दुकानदाराने FDA च्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने FDA ला चांगलेच खडसावले आहे. पुण्यातील मिठाई दुकानाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने FDA ला दिले आहेत. 98 टक्के अनुपालन अहवाल असूनही परवाना निलंबन सुरू ठेवणे अन्यायकारक असल्याचे निकाल कोर्टाने दिला आहे.

अधिक वाचा  धक्कादायक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश; मुख्य आरोपी सचिन अंदुरेलाही जामीन

गोसंवर्धन गोरस भंडारवर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे न्यायालयात सिद्ध

दरम्यान, यापूर्वी गोसंवर्धन गोरस भंडारवर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले होते. यामुळे हे गोसंवर्धन गोरस भंडार पुन्हा सुरु करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वर्धा येथील गोसंवर्धन गोरस भंडारवर धडक कारवाई केली होती. तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले होते. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी येत आल्याची माहिती समोर आली होती. तसेच तुपाचा साठा दीर्घकाळ ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले. FDA कडून जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. 31 मे रोजी नागपूर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत गोरसभंडार बंद केलं होतं. स्वच्छता नाही म्हणून गोरसभंडार बंद केलं होतं. पण हा मुद्दा हायकोर्टात टीकला नाही. वर्धा गोरसभंडारवर तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिलं ४० लाखांचे महापालिकेचे टॉयलेट स्वच्छतागृह की आलिशान घर बेडरूम हॉल अन् किचन!