IPL 2026 प्लेऑफचे ३ संघ फिक्स! 1 जागेसाठी 5 संघांमध्ये चुरश ; CSK vs SRH सामन्यानंतर समीकरण बदललं?

0

आयपीएल २०२६ प्लेऑफचं समीकरण आता रोमांचक वळणावर येऊन ठेपलं आहे. चेपॉकच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमधील सामन्यांनंतर प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या संघांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. प्लेऑफचे ३ संघ ठरले असून आता एका जागेसाठी पाच संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे आगामी सामने फार महत्त्वाचे असतील. इतर संघांसाठी प्लेऑफचं समीकरण कसं असणार, जाणून घेऊया……

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ सर्वाधिक १८ गुणांसह यंदाच्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. आरसीबीच्या पाठोपाठ गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनीही प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या १८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे सध्या समान १६ गुण आहेत, परंतु गुजरातचा नेट रन रेट किंचित चांगला असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब अजूनही चौथ्या स्थानावर आहे, परंतु संघ तिथेच कायम राहून प्लेऑफसाठी पात्र ठरणार की घसरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

आयपीएल प्लेऑफच्या अखेरच्या जागेसाठी ५ संघांसाठी कसं असणार समीकरण?

दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून केवळ 2 संघ अधिकृतरित्या बाहेर पडले आहेत. मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर, तर लखनौ सुपर जायंट्स दहाव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे सामने अद्याप शिल्लक आहेत. आता एका जागेसाठी स्पर्धा करणाऱ्या पाच संघांमध्ये पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे.

पंजाब, चेन्नई आणि दिल्ली यांचा प्रत्येकी एक सामना बाकी आहे. राजस्थान आणि कोलकाता यांचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत. केकेआर सध्या ११ गुणांसह आठव्या स्थानावर आहे, पण ते अजून स्पर्धेतून बाहेर पडलेले नाहीत.

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

आज १९ मे रोजी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने येणार आहेत. लखनौ स्पर्धेबाहेर झाल्याने राजस्थानसाठी हा एक महत्त्वाचा सामना असणार आहे. हा त्यांचा १३वा सामना असेल. राजस्थान सध्या १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. विजय मिळाल्यास संघ थेट अव्वल चारमध्ये पोहोचेल, या विजयामुळे त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नसले तरी, त्यांच्या संधी निश्चितच बळकट होतील. तर एकेक सामने शिल्लक असणाऱ्या संघांना शर्यतीत टिकून राहण्यासाठी सामना मोठ्या फरकाने जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.