शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ ३५,४७७ कोटींची थकबाकी; फक्तं पीककर्जाचीच माफी? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा…

0

भारतासह फक्त ‘या’ ६ देशांच्या जहाजांनाच परवानगी; हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा कडक पहारा;

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता महिना पूर्ण होत असताना, जागतिक व्यापाराची मुख्य नस समजल्या जाणाऱ्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’वर इराणने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर महिनाभर हा मार्ग पूर्णपणे ठप्प होता. मात्र, आता इराणने ‘निवडक नाकेबंदी’ जाहीर करत भारतासह आपल्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला आहे.

जहाजांची वर्दळ १० टक्क्यांहून कमी

युद्ध सुरू होण्यापूर्वी हॉर्मुझच्या या मार्गावरून दिवसाला सरासरी १०० हून अधिक जहाजे जात होती. मात्र, आता ही संख्या एकेरी अंकावर आली असून, काही दिवसांत केवळ ३ ते ४ जहाजांनाच यातून प्रवेश मिळत आहे. इराणच्या नौसेनेने या मार्गावर कडक पाळत ठेवली असून, विनापरवाना येणाऱ्या जहाजांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

भारतासह ‘या’ देशांना मिळणार प्रवेश

इराणने आपल्या मित्र राष्ट्रांची यादी जाहीर केली असून, केवळ या देशांच्या जहाजांनाच हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली आहे.

मित्र राष्ट्र : भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि थायलंड.

अटी आणि नियम : या देशांच्या जहाजांना इराणकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल आणि इराणी नौसेनेच्या नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहावे लागेल.

प्रचंड टोल : इराण या सुरक्षित कॉरिडॉरमधून जाण्यासाठी प्रति फेरी २ दशलक्ष डॉलर (सुमारे १७ कोटी रुपये) टोल आकारण्याचा विचार करत आहे.

अमेरिका आणि मित्र राष्ट्रांवर ‘बॅन’

इराणने अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या जहाजांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. या देशांच्या जहाजांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावर थेट हल्ले करण्याची धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिली आहे. यामुळे पाश्चात्य देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे.

भारतासाठी ‘लाईफलाईन’ का महत्त्वाची?

भारतासाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे कारण, भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्च्या तेलाची आयात याच मार्गावरून करतो. जर इराणने भारतासाठी हा रस्ता उघडला नसता, तर भारतीय जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून यावे लागले असते, ज्यामुळे पेट्रोल-डीझेलच्या किमती भारतात गगनाला भिडल्या असत्या. इराणी नौसेनेच्या सुरक्षेखाली प्रवास केल्यामुळे भारतीय जहाजांवरील हल्ल्याचा धोका कमी झाला आहे.

……..

भारतासाठी मोठा दिलासा चिंता करू नका! 94000 मेट्रिक टन LPG घेऊन 2 जहाजे भारताकडे रवाना,

इराण आणि अमेरिका यांच्यातीय युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जहाजांची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारताकडे येणार्‍या LPG च्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने रविवारी बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे, BW TYR आणि BW ELM होर्मुज सामुद्रधुनी पार करून भारताच्या किनाऱ्याकडे येत आहेत. यातील एक जहाज 31 मार्च रोजी मुंबईत आणि दुसरे जहाज 1 एप्रिल रोजी न्यू मंगळुरूमध्ये पोहचण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

या दोन्ही जहाजांबाबत बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की,’ भारतीय जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.’ मंत्रालयाकडून निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युरिया प्रकल्पांना होणारी पुरवठा मागील 6 महिन्यांच्या सरासरीच्या 70-75 टक्क्यांवर स्थिर आहे, तर पुरवठा टिकवण्यासाठी अतिरिक्त एलएनजी आणि आरएलएनजीची व्यवस्था केली जात आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.

एलपीजी वाहून आणणाऱ्या जहाजांवर लक्ष

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग (DG Shipping) जहाजमालक, RPSL एजन्सी आणि भारतीय दूतावासांसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयानुसार, DG Shipping चा कंट्रोल रूम 24×7 कार्यरत आहे आणि सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4523 कॉल आणि 8985 ईमेलची तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी गुजरातमधील जामनगर येथे डीपीए कांडला अंतर्गत वडिनार टर्मिनलवर 47,000 मेट्रिक टन एलपीजीचा साठा पोहोचला आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. तसेच भारतीय नौदलाच्या युद्धनौका व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी सज्ज आहेत. अशाही माहिती देण्यात आली आहे.

होर्मुज संकटात भारताला दिलासा

मंत्रालयाअंतर्गत झालेल्या बैठकीत बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून विविध संस्थांशी समन्वय साधत आहेत. भारताने होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड समुद्री वाहतूक कायम ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच पश्चिम आशियातील बिघडत्या सुरक्षेच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यातीही भाषा केली आहे. देशाच्या ऊर्जा हितांचे रक्षण करण्यासाठी या प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सरकारकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

…….

हवामान खात्याचा अलर्ट जारी! ३ दिवस राज्यात पुन्हा संकट, विदर्भ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा

मार्च महिना संपून आता एप्रिलला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश बागात उन्हाचा तडाखा बसू लागला असून गरमी, वाढतं ऊन, तापमान यामुळे राज्यातील नागिरक त्रस्त झाले आहेत. मात्र असं असलं तरी अवकाळी पावसाचं सावटही राज्यभरावर घोंगावत असून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गारपीट, पाऊस झाला आहे. पावसाने मध्यंतरी विश्रांती घेतली होती, मात्र आता राज्यात पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस राज्यासाठी कठीण असून, राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारा, पाऊस आणि तुरळक गारपीट होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून, फळांचा राजा असलेल्या आंब्याचं पीकही संकटात सापडण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्याचा मोहोर गळू शकतो आणि पीक, उत्पाहन कमी होऊ शकतं.

अधिक वाचा  नितीश कुमारांचा राजीनामा अन् बिहारमध्ये उलथापालथ; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

मार्च महिन्यात काही ठिकाणी झासलेल्या पावसामुळे आधीचं पिकांचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झालं आहे, आता महिनाअखेरीस देखील पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. एकीकडे ऊन, एकीकडे पाऊस यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी असेल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या मिलाफामुळे ही स्थिती निर्माण झाली असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या वरच्या स्तरात पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत.

आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किमी अतंरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहत आहे. हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे.

तसेच आज विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहेत. सोसाट्याचा वारा वाहू शकतो, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर राहील. बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळतील, ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या या भागात ऑरेंज अलर्ट

पाऊस आणि गारपिटीसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर. मंगळवार – जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे ऑरेंज अलर्ट आहे. तसेच आज आणि उद्या गारपिटीचा धोका जास्त आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घटनादुरुस्तीवरून विरोधी पक्षांना इशारा विरोधाची किंमत मोजावी लागेल! 

…………

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पी अधिवेशनात झाला आहे. मात्र, थकबाकीतील दोन लाखांचे पीककर्जच माफ होणार की मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील त्यात समावेश आहे, हा संभ्रम आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्यात पीककर्ज, मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश असेल, अशी माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे थकबाकी आहेत. त्यांच्याकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी असून त्यात पीककर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे. सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांकडील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. त्यात एक-दीड लाख रुपयांपर्यंतच पीककर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय बहुतेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित आहे, मात्र मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. त्यामुळे दोन लाखांची कर्जमाफी निकषांनुसार पात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

केवळ दोन लाखाचे थकीत पीककर्जच माफ होईल, असा निकष नसणार असल्याचेही सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. बॅंकांकडून प्राप्त थकबाकीदारांची व नियमित कर्जदारांची माहिती आता सहकार विभागाकडून वित्त विभागाला सादर होणार आहे. वित्त विभागाकडून त्यावर कार्यवाही होईल आणि कर्जमाफीसाठी निधी मंजूर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

शेतकऱ्यांकडील पीककर्जाची परतफेड करण्याची शेवटची मुदत ३० जूनपर्यंत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली दोन लाखांची कर्जमाफी मुदतीत मिळेल. त्यादृष्टीने सध्या संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.

– दत्तात्रेय भरणे, कृषी मंत्री

थकबाकीदारांना दोन लाखांची माफी

राज्यातील २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे बॅंकांचे ३६ हजार कोटींपर्यंत थकबाकी आहे. त्यात सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई,जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यात पीककर्ज असो की शेतीवरील मध्यम मुदतीचे कर्ज, त्या थकबाकीतील दोन लाख माफ होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडील थकीत कर्जाची स्थिती

एकूण शेतकरी

१,३३,४४,२०९

थकबाकीतील शेतकरी

२४,७३,५६६

एकूण थकबाकी

३५,४७७ कोटी

आता मिळणारी कर्जमाफी

२ लाख रुपये

कर्जमाफीची तारीख

३० जून