“मतमोजणी अचानक पुढे ढकण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकार जबाबदार”, विरोधकांचा गंभीर आरोप

0

नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता. परंतु मतदान सुरू असतानाच अचानक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरू केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत माहिती दिली, ‘निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून, हा पूर्णपणे पोरखेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचीही या प्रकारासाठी जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढत ओबीसीला २७ टक्के आरक्षण लागू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा व्यक्त झाला आहे. हे सरकार नेमके कोणत्या दिशेने काम करत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  देशात गॅस संकट कमी? ‘इतके’ लाख सिलिंडर्स भरणार कतारहून ‘शिवालिक’ जहाजातून ४६,००० मॅट्रिक टन LPG दाखल

उद्या होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. याआधी राज्यात इतक्या निवडणुका झाल्या, तरी कधीही असा प्रकार घडला नव्हता. फडणवीस सरकार यासाठी थेट जबाबदार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

मतमोजणीत उशीर करणे म्हणजे निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकणे, पैशांचा वापर करणे आणि मत चोरीचा डाव तर आखला जात नाही ना, असा प्रश्नही समोर आला आहे. निकाल अनुकूल येणार नाही अशी शक्यता पाहून निकाल फिरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न असल्याचे तीव्र वक्तव्य करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिकेची TDR प्रक्रिया झाली सोपी; आयुक्त नवल किशोर राम यांचे परिपत्रक काढून बदल