भारताने पाडले होते पाकिस्तानचे ६ लढाऊ विमाने आणि एक C-१३० विमान… ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा

0
2

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय हवाई दलाने सहा पाकिस्तानी लढाऊ विमाने हवेत पाडली. यासोबतच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली. सूत्रांनी ही माहिती ANI या वृत्तसंस्थेला दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाला झालेल्या नुकसानाचे विश्लेषण केले, तेव्हा असे आढळून आले की भारताच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई दलाची सहा लढाऊ विमाने, दोन उच्च मूल्याची विमाने, १० हून अधिक UCAV, एक C-१३० वाहतूक विमान तसेच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली.

सूत्रांनी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली सुदर्शनने पाकिस्तानमध्ये बराच नाश केला. सुदर्शन क्षेपणास्त्राद्वारे ३०० किलोमीटर अंतरावरून लांब पल्ल्याचा अचूक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सुदर्शनने पाकिस्तानचे एक उच्च मूल्याचे विमान पाडले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. भोलारी एअरबेसवर हल्ला करून भारताने स्वीडिश मूळचे AEWC विमान पाडले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

सूत्रांनी सांगितले की, हँगरमध्ये लढाऊ विमाने असल्याची माहिती आहे, परंतु पाकिस्तानी तेथून अवशेष काढत नाही, त्यामुळे आम्ही जमिनीवर असलेल्या लढाऊ विमानांचे नुकसान मोजता येत नाही. पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाच्या रडार आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेने पकडली आणि हल्ल्यानंतर ती गायब झाल्याचे दिसून आले.

सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी तळांवर हल्ला करण्यासाठी फक्त हवेतून सोडल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. राफेल आणि एसयू-३० जेट विमानांनी चिनी ड्रोन नष्ट केले. सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दल अजूनही संघर्षादरम्यान गोळा केलेल्या मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करत आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ते ७ मे रोजी सुरू झाले. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने तो हाणून पाडला. दोन्ही देशांमधील संघर्ष १० मे पर्यंत सुरू राहिला. भारतीय हवाई दलाच्या जलद हल्ल्यांनंतर पाकिस्तानने भारताला युद्धबंदीची विनंती केली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला.