“…आता कोणी रोखू शकत नाही”, भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंचे ट्वीट

0

राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले. तर आपला पराभवाचा झटका बसला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होणार असल्याचे निश्चित होताच आता महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच भाजपचेही अभिनंदन केले आहे. “खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
दरम्यान नवी दिल्लीत ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज दिल्लीत मतमोजणी पार पडली. या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आप पोस्टल तसेच ईव्हीएम मतमोजणीतही पिछाडीवर पाहायला मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  वाल्हेकर गुरुजींची तत्परता! कोवळ्या कळ्यांना आधार अन् आहारही; मुलींना विश्वासात घेऊन पुन्हा सुरक्षित हाती सोपवलं