ना आलिशान फ्लॅट अन् बंगला; काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट?

0

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काल रविवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या घराच्या म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हवेत तीन राउंड फायरिंग केल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या. रिपोर्ट्नुसार, जो आरोपी आहे तो गुरुग्रामचा असून त्याचं नाव कालू आहे.

सलमान खानला ज्याप्रकारे जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे आणि आता त्याच्या घराच्या बाहेर फायरिंग झाली, त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. सतत धमक्या मिळत असल्या तरी सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट का सोडू शकत नाही. त्याच्या चाहत्यांना ही गोष्टी जाणून घ्यायची आहे. त्याचं कारण स्वत: सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

सलमान खान त्याची आई सलमान खानवर असलेल्या प्रेमामुळे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणं पसंत करतो. सलमान खानला त्याच्या आयुष्यातील सुरुवातीच्या गोष्टींळी खूप जवळीक आहे. त्यापैकी एक हे घर असून त्याच घरात रहायला त्याला आवडतं. 2009 मध्ये फराह खानच्या टिव्ही शो दरम्यान, सलमान खाननं या गोष्टीला स्विकारले होते की आई-वडिलांवर असलेलं प्रेम त्याला ते घर सोडू देत नाही.

सलमान म्हणाला, जेव्हा आम्ही मोठे होतं होतो, तेव्हा आम्ही आई आणि वडिलांजवळ जाऊन लोळायचो. आजा देखील सलमानसाठी त्याचं कुटुंब आणि आई-वडील सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सलमानच्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅटमध्ये त्याचे आई-वडील राहतात. लग्नानंतर अरबाज खान आणि सोहेल खान वेगवेगळे राहायला गेले. पण आजही कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक असला तरी सलमान खाननं ते घर सोडलेलं नाही.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

सलमान खानच्या कामाविषयी बोलायच झाले तर तो लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसणार आहे. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. यावर्षी ईदच्या निमित्तानं सलमाननं त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करणार आहेत.