रोहित पवारांचा मीडियासमोर खेकडा दाखवत सहा हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप

0

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत राज्यातील भ्रष्टाचाराचा मोठा गौप्यस्फोट केला. राज्यातील आरोग्य विभागात सहा हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी करत दुसरी फाइल उघडून अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन पुन्हा एकदा वाजवला आहे.

राज्यातील तब्बल सहा हजार कोटींचा ‘अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा’ ‘सरकारनामा’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला या घोटाळ्यावरून घेरले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या टेंडरमध्ये काही बदल करून, राज्य सरकारने एकप्रकारे हा घोटाळा कबूलच केला आहे. त्यानंतर आता ठाकरेंनीही या घोटाळ्यावरून शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवार यांनी या घोटाळ्यातील दुसरी फाइल ओपन करून या घोटाळ्याच्या सायरन पुन्हा एकदा वाजवला.

अधिक वाचा  छत्रपती संभाजी महाराजांची ‘मॉडर्न आर्ट’च्या नावे अवहेलना; नव्याने बसविलेल्या पुतळ्याचा वाद; शिवप्रेमी संघटना आक्रमक

पुणे येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार म्हणाले, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

पवार म्हणाले, “निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून, नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाइन करून वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडेसहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून, राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

“स्वच्छता काम टेंडर अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपन्यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार करण्यात आला. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाइन केले आणि त्यांनाच मिळाले. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना ही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हीजी कंपनीलाही नाराज न करता त्यांनादेखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे.” सावंत यांना मी पाच दिवसांचा वेळ देतो, त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून, पारदर्शक प्रक्रिया राबवावी, असा टोला त्यांनी लगावला.

अधिक वाचा  मतदारांसाठी धोक्याची घंटा! केवळ एकच दिवस उरला पुण्यातील २८ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? आजच तपासा यादी

खेकडा आरोग्य विभागाला पोखरतोय

तानाजी सावंत यांनी ” खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते” असे विधान केले होते, या विधानाचा आधार घेत पवार म्हणाले, ” सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जाऊन बसतो. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय.