आझाद-मैदानावरुन मराठा-ओबीसी आमने-सामने, दोघांचे अर्ज, कोणाला मिळणार परवानगी?

0

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलं आहे. एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा-ओबीसी समाजाने एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. तर मनोज जरांगे यांच्या आधीच ओबीसी आंदोलनकांनी आझाद मैदानासाठी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली आहे. त्यामुळे आझाद मैदानावरून दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.

ओबीसींनी 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलनाची मागणी केली आहे. वकील मंगेश ससाणे यांनी 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केला आहे. परवानगी प्रक्रिया सर्वात आधी आम्ही अर्ज केला आहे, त्यामुळे नियमानुसार, ओबीसी आंदोलनाला प्रथम प्राधान्य मिळायला हवे, अशी भूमिका ससाणे यांनी घेतली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

दोघांनी एकाच मैदानासाठी केले अर्ज

वकील मंगेश ससाणे यांनी म्हटलं की, ‘आम्ही कायद्यानुसार आणि वेळेआधीच अर्ज दाखल केलाय. मनोज जरांगेंचं वरातीमागून घोडे चालणार नाही. आता प्रशासनाने अर्जाची तारीख आणि नोंदणीचा क्रम लक्षात घ्यावा. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा’. ओबीसी, व्हिजेएनटी, अलुतेदार, बलुतेदार समाजासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसीतून कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा ओबीसीतून कुणबी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील आंदोलन पुन्हा मुंबई धडकण्याच्या तयारी आहे. त्यात ओबीसी संघटनांनी आधीच आझाद मैदानासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटाकडून एकाच मैदान आणि कालावधीत मागणी केली आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलीस प्रशासन कोणाला परवानगी देणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व! – डाॅ. श्रीपाल सबनीस