डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाही आणि राष्ट्रवाद जो मानतो तोच खरा बौद्ध : डॉ. प्रा. संजय खैरे

0

मुंबई दि. ८ (रामदास धो. गमरे) “वैज्ञानिक तत्त्वे आणि विज्ञानवादी विचारधारा अंगीकारून जीवनाची वाटचाल करणारा माणूसच खरा बौद्ध असतो. केवळ विचार वाचून किंवा ऐकून उपयोग नाही; ते विचार आपल्या आचरणात आणणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने बौद्ध ठरतो. २२ प्रतिज्ञांचे पालन करून आपले आचरण उच्च प्रतीचे ठेवणारा, स्वातंत्र्य, समता आणि समानतेची मूल्ये मानणारा व्यक्तीच खरा बौद्ध आहे,” असे प्रतिपादन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफत असताना डॉ. प्रा. संजय हिराजी खैरे यांनी केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यामागील कारणमीमांसा, त्यामागील तत्त्वज्ञान आणि विचारधारा यावर सखोल विवेचन केले त्यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. संदेश खैरे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बाबासाहेबांची विज्ञाननिष्ठ, मानवतावादी आणि समतावादी विचारधारा उपस्थितांसमोर मांडली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकनिष्ठ जीवनपद्धती हीच बौद्ध धम्माच्या आचरणाची मूलभूत मूल्ये असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १३ येथे संपन्न झाले. सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बौद्धाचार्या मेघाताई जाधव यांनी आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक विधी पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी प्रास्ताविकातून “डॉ. प्रा. संदेश खैरे यांच्या साहित्य क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाचा सविस्तर आढावा घेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी आजवर केलेले उल्लेखनीय कार्य व संपादन केलेल्या विविध पदव्या तसेच त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती मांडली सोबतच यंदाच्या वर्षावास व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य, तिच्यामागील व्यापक वैचारिक भूमिका आणि समाजप्रबोधनाच्या दृष्टीने या उपक्रमाचे असलेले महत्त्वही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून अधोरेखित केले.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “डॉ. संदेश खैरे यांनी बुद्ध तत्त्वज्ञानाचे विचार आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केल्या नंतरचे विचार याची सविस्तर आणि अगदी सोप्या व सहज समजेल अशा भाषेत केली, तसेच आपण बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जे वाचनालय सुरू केले आहे ते शासकीय नियमाप्रमाणे चालवत आहोत तरी प्रत्येकाने कार्यक्रमाला येताना एक तरी पुस्तक धम्मदान म्हणून दान करावे असे आवाहन केले तसेच बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला त्याचा शताब्दी महोत्सव आपण महाड या ठिकाणी वर्षभर साजरा करणार व सोबतच कॅलेंडर, स्मरणिका, पंचशील पाक्षिक आपण चालू करत आहोत सोबतच अनेकविध क्रीडा स्पर्धा आपण आयोजित करीत आहोत त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या” असे नमूद केले

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

सदर कार्यक्रमास जेजे हॉस्पिटलचे डॉ. सोनकांबळे, उपसभापती विनोद मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, चिटणीस लवेश तांबे, अनिरुद्ध जाधव, रवींद्र शिंदे, संदेश खैरे, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अरुण गमरे, सुरेश मंचेकर, उदय कांबळे, अतुल साळवी, जेष्ठ पत्रकार काजलीकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, महिला मंडळ, विविध उपसमित्या, मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळ, विश्वस्त मंडळ, सर्व शाखा व त्यांचे कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.