राजधानी दिल्ली ‘इंटरनेट’ बंद, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; आंदोलक संसदेच्या दारावर, वातावरण तापलं!

0

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाची राजधानी दिल्ली आंदोलनाने आणि पोलिसांच्या लाठीमाराने हादरली आहे. ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि देशातील वाढत्या बेरोजगारीविरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या’चलो संसद’ मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-युवक रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी झालेल्या लाठीमारानंतर विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहेत. काही आंदोलक संसदेजवळ पोहचले असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलाने संसदेचे प्रवेशद्वार बंद केले आहे. तर, रेल भवनजवळ अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तर, संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त आहे.

अधिक वाचा  CJPच्या मोहिमेनंतर मोठा निर्णय सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; फोटो व्हिडिओ काढण्यासही बंदी, माध्यमिक शिक्षण संचालकांचे पत्रक

संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या हजारो संतप्त आंदोलकांनी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेने उभारलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी संसद मार्ग परिसरात आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. या घटनेमुळे संपूर्ण जंतरमंतर आणि संसद मार्ग परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॅरिकेड्स तोडताच पोलिसांशी झटापट!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी ११.२५ च्या सुमारास हाय-सिक्युरिटी झोनमध्ये (High Security Zone) हजारो आंदोलक जमा झाले. संसदेला वेढा घालण्याच्या इराद्याने आलेल्या या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले एकापाठोपाठ एक अनेक बॅरिकेड्स हटवण्यास आणि ते ओलांडून पुढे जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र झटापट झाली. या धुमश्चक्रीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या…

काही आंदोलक रेल भवनजवळ पोहचले. रेल भवनजवळ असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

१० ते १५ आंदोलक ताब्यात, ‘कलम १६३’ लागू!

बॅरिकेड्स तोडून आंदोलक पुढे जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि गर्दी पांगवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळानंतर पोलिसांनी १० ते १५ प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आंदोलकांना संसदेच्या मुख्य इमारतीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी आता संपूर्ण परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या