खडकवासला कॅनॉल विसर्ग वाढवला; पुणेकरांच्या पाण्यावर गंडांतर? दौंड, इंदापूर मधील गावांना पिण्याचे पाण्यासाठी निर्णय

0

पुणे: खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात गेल्या दहा दिवसांपासून ७०० क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढत आता एक हजार क्युसेकने केला आहे. दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी हा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. पालखी सोहळाही इंदापूर तालुक्यात असल्याने वारीसाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणीच सोडण्यात येत आहे. हे पाणी पिण्यासाठीच देण्यात येत असून इंदापूर तालुक्याला पाणी लवकर पोचावे, असे नियोजन असल्यानेच विसर्गात वाढ केल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मात्र, चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबलेला असताना कालव्यातील विसर्ग वाढविल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यावर गंडांतर येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खडकवासला प्रकल्पात सध्या १६.९० टीएमसी (५८ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला वगळता पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यातून शुक्रवारी (ता. १७) सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये केवळ १२१ दशलक्ष घनफूट टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तुलनेने पाण्याचा येवा अत्यल्प आहे.महिन्याच्या सुरुवातीला आठवडाभर झालेल्या पावसामुळे ९ जुलैपर्यंत खडकवासला धरणाच्या कालव्यातून आणि सांडव्यातून विसर्ग करण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर सांडव्यातून विसर्ग बंद करण्यात आला. मात्र, कालव्यातून विसर्ग सुरूच आहे. खडकवासला धरणातील ०.६ टीएमसी पाणी वारीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यातील आतापर्यंत ०.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी दौंड व इंदापूर तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याच वेळी संत तुकाराम महाराज यांची पालखी बारामती व इंदापूर तालुक्यात आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी विसर्ग वाढविणे गरजेचे होते. तरच एका दिवसात पाणी इंदापूर तालुक्यात पोचू शकेल.

अधिक वाचा  आझाद-मैदानावरुन मराठा-ओबीसी आमने-सामने, दोघांचे अर्ज, कोणाला मिळणार परवानगी?

कमी क्युसेकने विसर्ग सोडल्यास पाणी पोचण्यास उशीर झाला असता. त्यामुळे ३०० क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहराच्खडकवासला प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्याने शहरात पाणीकपात सध्या स्थगित असली तरी कालव्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे ती पुन्हा सुरू होण्याची भीती आहे. त्यातच आता विसर्ग वाढविण्यात आला आहे. हा विसर्ग वाढल्याने पाणीकपातीची पुन्हा शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विसर्ग वाढविल्याची कारणे जाहीर करावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.या पिण्याच्या पाण्यासह ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचन देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. त्यामुळे सध्याचे पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडावे लागते. आता पाणी सोडण्यात आल्याने ऑक्टोबरमधील सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरील ताण कमी होणार असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  धक्कादायक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश; मुख्य आरोपी सचिन अंदुरेलाही जामीन

पाणी कपातीची भीती

खडकवासला प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्याने शहरात पाणीकपात सध्या स्थगित असली तरी कालव्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे ती पुन्हा सुरू होण्याची भीती आहे. त्यातच आता विसर्ग वाढविण्यात आला आहे. हा विसर्ग वाढल्याने पाणीकपातीची पुन्हा शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विसर्ग वाढविल्याची कारणे जाहीर करावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.