राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवरुन गाजणार; विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

0

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून परंपरेनुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. राज्य सरकारकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं विरोधकांना निमंत्रण देण्यात आलं. पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भूमिका मांडण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेत अपात्र करण्यात आलेला महिलांचा मुद्दा ते नीट परीक्षा घोटाळा, विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती अशा विविध मुद्दे या पत्रात करण्यात आली आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली.

प्रत्येक माणसावर 70 ते 80 हजार रुपयांचं कर्ज अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली- काँग्रेस नेते सतेज पाटील

अधिक वाचा  आंतरराष्ट्रीय योग दिन कोथरूड ३५०० मुलींकडून योग प्रात्यक्षिके; योगाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी ‘योग निकेतन’ची स्थापना

“आम्ही प्रत्येक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरु. मंत्र्यांमधील वाद आम्ही बघतोय. त्यांच्यातला वाद सभागृहातही येतोय की काय? असं वाटतंय. साडेनऊ लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. प्रत्येक माणसावर 70 ते 80 हजार रुपयांचं कर्ज आलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला योग्य वाटत नाही, अशी आमची भूमिका आहे”, असं सतेज पाटील म्हणाले.

केळी आणि द्राक्ष, पेरु, डाळिंब या फळबागांचं नुकसान सरकारची मदत जाहीर नाही- जयंत पाटील 

“आम्ही चहापानावर बहिष्कार घातला. त्याची काही कारणे सतेज पाटील आणि भास्कर जाधव यांनी सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरिप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेने ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याने पेरणी केली तिथे बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालं आहे. द्राक्ष, पेरु, डाळिंब या फळबागांचं नुकसान होऊन सरकारने मदत जाहीर केलेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मांडली.

अधिक वाचा  कोथरुड विकास प्रकल्पांतील अडचणी दूर करून कामे गतिमान करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

“पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि पिण्याचा पाण्याचा पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आहे. जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे कामे असतील, लाखभर कोटींचे बिलं सरकारने दिले नाहीत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

विरोधी पक्षनेतेपद अधिकाराचा वापर विरोधी पक्षांनी केला तर पापं बाहेर येतील- भास्कर जाधव

“विरोधी पक्षनेते पद घटनात्मक पद आहे. विरोधी पक्षाला त्याचं मतच मांडू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेतेपद दिलं तर त्यांना तसं करता येणार नाही. कारण ते घटनात्मक पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही. विरोधी पक्षनेतेपद घटनात्मक आहे. त्या अधिकाराचा वापर विरोधी पक्षांनी केला तर आपली अनेक पापं बाहेर येतील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटते”, असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.

अधिक वाचा  सुनेत्रावहिनी पक्षातील भाकरी फिरवणार रिप्लेसमेंटही सापडली, युवक, महिला, विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी यांची होणार नियुक्ती?