इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू,पाणी संवर्धन,वीरगळ संवर्धन,पर्यावरण संवर्धन, विहिरीचे पुनर्जीवीकरण, प्राचीन अवशेष असलेल्या जागेची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. नुकतेच प्रतिष्ठान मधील तरुणाने मुळशीतील ताम्हिणी घाटाच्या अलीकडे निवे ते लोणावळा मार्गावर असणाऱ्या परातेवाडी गावाच्या हद्दीत देश आणि कोकण यांना जोडणारा अतिप्राचीन घाट असा मार्ग आहे.. जो की ताम्हिणी ते भिरा या गावाला जोडतो.. या जोडणाऱ्या घाटाला सावळ्या घाट म्हणतात.






मागील वर्षी उन्हाळ्यात सावळ्या घाटावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्याची स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती मात्र साऊथ चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते या घाटावरून देवकुंड धबधबा, रिंग धबधबा, कुंडलिका व्हॅली ,प्लस व्हॅली, भिरा धरण विलोभनीय दर्शन होते त्यामुळे अल्पावधीत पर्यटकाच्या पसंतीस पडलेल्या या घाटावर इंस्टाग्राम वायरल पोस्ट मुळे पर्यटकांची गर्दी वाढली असल्याने प्लास्टिक बाटल्या चे प्रमाण अतिप्रमाणात दिवसेदिवस वाढ झाली असल्याचे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान निदर्नास आले.त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातील स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते..
रविवारी सकाळी शिव वंदना घेऊन सावळ्या घाटाच्या दीड किलोमीटरच्या सावळ्या घाट मार्गावर असणाऱ्या पायवाटेवरील सर्व प्लास्टिक बाटल्या व एनर्जी ड्रिंक चा कचरा जमा करण्यात आला व तो एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून विल्हेवाट लावण्यात आली. व शिवघोष करून मोहिमेचे सांगता करण्यात आली.
या प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा मंगेश जी नवघणे म्हणाले, मुळशी वनक्षेत्र हद्दीत येणाऱ्या या सावळ्या घाटमार्गाला त्वरीत उपाययोजनेचे गरज आहे. त्वरीत रेलिंग व कठडे बसवण्यात आले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येईल व प्लास्टिक बाटल्या वरती जी वासोटा किल्ल्यावर बंधने आहेत ती सर्व लागू करण्यात यावी.. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करून पर्यटकांकडून तिकीट आकारण्यात यावे. व देखरेखीखाली वनसेवकाची नेमणूक करण्यात आली पाहिजे. अशी मागणी मुळशीतील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे..
या मोहिमेत केदार मारणे, आमिर वाघे , ऋषिकेश साळुंखे, अक्षय जागडे, स्वप्निल कळंबटे उपस्थित होते.. या मोहिमेचे आयोजन मंगेश नवघणे यांनी केले.











