पुण्यातील महिलेला कचऱ्यात सापडले 10 लाख, झटक्यात श्रीमंतीची संधी, पण तिने जे केलं ते ऐकून सॅल्यूट ठोकाल

0

रुपया-रुपयांच्या वाट्यांवरून रक्ताच्या नात्यांमध्ये टोकाची भांडण ज्या समाजात होतात, त्यात समाजात निरपेक्ष भावनेतून माणुसकीचा धर्म बाळगणारी माणसंही राहतात. सभोवताली भेटणाऱ्या स्वार्थी लोकांची संख्या वाढत प्रामाणिकपणा जपणारी माणसंही आहेत, याचं प्रत्यक्ष अनुभव देणारी घटना सदाशिव पेठेत घडली. रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपये ठेवलेली पिशवी प्रामाणिकपणे परत देत अंजूताईंनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.

कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कचरावेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने सदाशिव पेठेतील काही गल्ल्यांमध्ये काम करतात. दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता त्या दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या. संकलित झालेला कचरा फिडर पॉईंटला आणताना आठच्या सुमारास त्यांना संकलन केंद्राजवळ रस्त्यावर कचऱ्यात एक मोठी पिशवी पडलेली दिसली.

अधिक वाचा  ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणार; उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव;  धरण उणे २१ टक्के, पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

ती गल्ली औषधांच्या दुकांनांची असल्याने अनेकदा तिथे औषधांची पाकिटं सापडतात. मग दिवसभरात लोक शोधत येतात. यापूर्वीही अशाच औषधाच्या पिशव्या मिळाल्याचा अनुभव अंजूताईंना होता, त्यामुळे त्यांनी पिशवीचा मालक शोधत येईल, असा विचार करून पिशवी संकलन केंद्रात सुरक्षित ठेवली. काही वेळानंतर ती पिशवी उघडली तेव्हा औषधांसोबत त्यात मोठी रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि धक्का बसला.

अंजूताई तिथे २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. औषधं आणि एवढी मोठी रक्कम हरवलेली व्यक्ती चिंतेत असणार याची त्यांना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी शोध मोहीम सुरू ठेवली. दरम्यान, एक व्यक्ती त्याच रस्त्यावर काही तरी शोधत असल्याचे त्यांना दिसली. व्यक्ती अस्वस्थ दिसत होती.

अधिक वाचा  केंद्र सरकारला वित्तीय शिस्तीत चांगले गुण; वित्तीय तूट ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत रोखण्यात खर्चात कपातीमुळे यश

अंजूताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. सापडलेली पिशवी त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच दहा लाख रुपये आणि औषधांची ती पिशवी त्यांच्या हातात ठेवली. चिंतातूर झालेली त्या व्यक्तीला अंजूताईंचे आभार मानताना शब्दच सुचले नाहीत. साडी आणि काही रोख रक्कम भेट देत त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अंजूताईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. गेल्या वीस वर्षांपासून मनापासून काम करणाऱ्या अंजूताईंबद्दल असलेली विश्वासाच्या नात्याची वीण या प्रसंगाने अधिक घट्ट झाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

आपल्याकडचे थोडेसे पैसे इकडे तिकडे झाले, तरी आपल्याला टेन्शन येते. मला सापडलेल्या पिशवीत भरपूर पैसे होते. औषधेही होती. त्यामुळे ज्या व्यक्तीचे पैसे हरवले ती किती काळजीत असेल याचा विचार मी केला. त्यामुळे मी पिशवीचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्तीही सापडली.

अधिक वाचा  ‘सरकारचे जरांगे पाटलांकडून ब्लॅकमेलिंग, सरकार गेल्या 3 वर्षांपासून दबावापुढे गुडघे टेकताना दिसत आहे ‘ आता कुणबी सेना मैदानात

– अंजूताई माने, कचरावेचक, सदाशिव पेठ