भारताचा NOTAM जारी आता हवेतून कोंडी! पाकिस्तानी विमानांना भारतीय

0

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द करत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. आता बुधवारी भारताने NOTAM जारी करत पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी घातलीय. यामुळे कोणत्याही पाकिस्तानी विमानाला भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही.

भारताने पाकिस्तानात नोंदणी केलेल्या, पाकिस्तानकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडे तत्वाने घेतलेल्या विमानांसाठी, तसंच एअर लाइन्स आणि लष्करी उड्डाणांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केलंय. ३० एप्रिल ते २३ मे २०२५ पर्यंत कोणत्याही पाकिस्तानी विमानाला भारताच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

अधिक वाचा  पोटनिवडणूक मतदानापूर्वी केंद्राच्या ‘एनसीडीसी’चा झटका! अजितदादांच्या ‘छत्रपती’सह 7 साखर कारखान्यांना फटका!