लोकसभा निवडणुक घोषणेच्या 22 दिवसानंतरही एवढ्या लढती अस्पष्टच…; महायुती अन् महा आघाडीच्या बेठकाच

0

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 22 दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यापूर्वी दोन महिन्यांपासून सुरू असलेला महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील 48 पैकी 16 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे. याठिकाणाच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत आहे.

महाविकास आघाडीने अद्याप सात जागेवरील उमेदवार जाहीर केले नाहीत तर महायुतीने जवळपास 9 जागांवरील उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या जागांवरील जागावाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः काही जागांवर महायुती व महाविकास आघाडीतील दोन-तीन पक्षाने दावा केला असल्याने या जागांवरील उमेदवार फायनल झाले नसल्याचे समजते.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

धुळे महाविकास आघाडीतील माढा, रावेर, जालना, उत्तर मुंबई, मुंबई दक्षिण मध्य, धुळे, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेली नाहीत. या जागावरून आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात मतभेद आहेत.

महायुतीमध्ये सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मध्य मुंबई, दक्षिण मुंबई येथील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. या जागांवरून महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही जागांवरून वाद असल्याने काही ठिकाणचे उमेदवार ठरले नसल्याने घोषणा बाकी आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार फायनल झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढच्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याने आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जागांवरील उमेदवार घोषित करावे लागणार आहेत.

तिसरा टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर मतदान 7 मे ला होणार आहे. त्यामध्ये राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.