राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’ विभागांवर अवकाळी पावसाचं संकट पश्चिम महाराष्ट्रातही हे सावट

0

राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी दुहेरी वातावरणाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जारी करण्यात आली. कोकण विभागात प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.18 मे 2026 रोजी काही ठिकाणी उष्णता तर कुठे अवकाळी पावसाचं सावट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणसह मुंबईचं वातावरण कसं राहील?

कोकण विभागात प्रामुख्याने पालघर आणि मुंबई या दोन जिल्ह्यांना हवामान कोरडं राहील अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच याच विभागात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे.

अधिक वाचा  राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल… ABVP तक्रारीची गंभीर दखल

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच बीड, नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावासाची शक्यता आहे. दरम्यान नांदेड आणि बी़ड या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाच्या इशाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचं सावट

तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवला आहे.

अशातच जाणून घेऊयात 18 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे…

अधिक वाचा  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटी पाऊस एन्ट्री मारणार, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

कोकण

कोकण विभागात पालघर, मुंबई, या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे ठाणे, रायगड या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीगर, जालना या दोन जिल्ह्यात हलक्या पावासाची शक्यता वर्तवली आहे. तसेच बीड, नांदेड या या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिंगोली, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. तसेच बीड, नांदेड या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला. तसेच लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन

विदर्भ

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.