अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कामगार भूषण, कवी राजेंद्र वाघ यांची “उजेड भरू”कविता गाजली

0

सातारा येथे आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी राजेंद्र वाघ यांनी शेतकऱ्याला जगण्याचे बळ देणारी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कवि संमेलनाचे अध्यक्ष  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कामगार भूषण राजेंद्र वाघ यांना शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

राजेंद्र वाघ यांचे जीवन, मशाल, निर्भय, श्रमिकांचं गोंदण, इत्यादी ४ काव्यसंग्रह तसेच स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालसाहित्य प्रकारातील चरित्र आणि अनेक दिवाळी अंकात अनेक कविता आणि कथा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाले असून अनेक कवीसंमेलनाचे राजेंद्र वाघ यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

अधिक वाचा  शरद पवारांचा ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅनही रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणून अनेक नवोदित साहित्यिक आणि कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी अग्रेसर असतात.