महाराष्ट्र विधान परिषदेचे पाच सदस्य निवृत्त, विरोधकांचा आवाज क्षीण; मागील खळबळजनक घडामोडीमुळे पुणे विभागाकडे पुन्हा लक्ष

0

विधान परिषद सदस्यत्वाची सहा वर्षाची मुदत पूर्ण झाल्याने सभागृहात पाच सदस्यांना निरोप देण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवृत्त होणाऱ्या मध्ये सतीश चव्हाण, अरुण लाड, (राष्ट्रवादी) अभिजित वंजारी, (काँग्रेस) किरण सरनाईक ( शिवसेना) आणि जयंत आसगावकर (काँग्रेस) या पाच सदस्यांना समावेश आहे. विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लोकशाही आणि प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. देशातील सहा राज्यात विधान परिषद अस्तित्वात असून महाराष्ट्रालाही ही परंपरा लाभली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विधान परिषद करत आहे.

अधिक वाचा  महसूल विभागात मोठी भरती! 2122 कोतवाल भरती; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत ही भरती होणार

सतीश चव्हाण यांनी शिक्षण, तरुणांचे प्रश्न आणि रोजगाराच्या विषयांवर सातत्याने प्रभावी भूमिका मांडली. विविध शैक्षणिक व विधानमंडळाच्या समित्यांवरील त्यांचा अनुभव सभागृहासाठी मोलाचा ठरल्याचे सभापतींनी शिंदे म्हणाले. जयंत आसगावकर यांनी शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवरील त्यांचा अभ्यास आणि शांत, संयमी संसदीय शैली प्रेरणादायी आहे.अभिजित वंजारी यांनी कायदेशीर, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित केले. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळे त्यांनी सभागृहात वेगळी छाप पाडल्याचे सभापतींनी सांगितले.

अरुण लाड यांनी सहकार, शेती आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सातत्याने मांडले. दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न आणि सहकार क्षेत्रातील विषयांवर त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सभापतींनी नमूद केले.किरण सरनाईक यांनी शिक्षक, विनाअनुदानित शाळा आणि शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले. त्यांचा मनमिळावू स्वभाव, व्यापक जनसंपर्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे सभापतींनी सांगितले.

अधिक वाचा  “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ